शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

खाजगी कंपनी नेमूनही कचरा संकलनाचा खर्च जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 8:14 PM

बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत.

ठळक मुद्दे महानगरपालिकेचा दावा ठरला फोलकंपनीतर्फे शहरात फक्त सहा प्रभागांत काम केले जात आहे.

औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने नेमलेल्या कंपनीने महापालिकेला सादर केलेले बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत.

मागील काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कचरा संकलनाचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून करून घेत होते. दरवर्षी कचरा संकलन आणि वाहतुकीचा खर्च तब्बल ६० कोटींपर्यंत जात होता. या कामात सुसूत्रता यावी, खर्च कमी व्हावा, या  हेतूने मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची कचरा संकलनासाठी नेमणूक केली आहे. या कंपनीने सादर केलेले तीन महिन्यांतील बिल दीड कोटींपर्यंत पोहोचले आहे. कंपनीच्या कामामुळे मनपाचे १ कोटी २२ लाख रुपये वाचले आहेत.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी कंपनीची नियुक्ती केली आहे. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीमुळे १ कोटी २२ लाख रुपये वाचल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी घनकचरा व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेची बचत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

कंपनीतर्फे शहरात फक्त सहा प्रभागांत काम केले जात आहे. दररोज दोनशे ते अडीचशे टन कचरा कंपनी संकलन करते व तो कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेते. गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे महापालिकेकडे दीड कोटी रुपयांचे बिल थकीत आहे. हेच काम महापालिकेतर्फे खासगी वाहने लावून केले असते, तर १ कोटी २२ लाख रुपये खर्च येत होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. ८० लाख रुपयांचे पेट्रोल - डिझेल, तर ४० लाख रुपये मजुरांवरील खर्चापोटी वाचल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनीमुळे खर्च वाढला, असे एकाही अधिकाऱ्याने सांगितले नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नfundsनिधी