शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

CoronaVirus : रुग्णसंख्येत होतेय घट; कोरोनाला हरविण्याकडे औरंगाबादची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:48 IST

CoronaVirus: गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला.

ठळक मुद्देशहरात रुग्ण कमी होत असताना ग्रामीण भागांत रुग्णसंख्येचा चढता क्रम कायमब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्तीचा फायदा

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन महिने कोरोनाच्या हाहाकारानंतर आता शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. रोज निदान होणाऱ्या शहरातील रुग्णसंख्येत घट होत असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी केवळ ३० टक्के रूग्ण शहरातील आहेत. तर तब्बल ७० टक्के रूग्ण ग्रामीण भागातील आहे. कोरोनाला हरविण्याकडे शहराची वाटचाल सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात रुग्णांची अद्यापही संख्या वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाने अक्षरश: कहर केला. अवघ्या काही दिवसांत ५० हजारांवर रुग्णांची भर पडली. रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी भरून गेल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला. जिल्ह्यात ५ मे रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार ४४४ होती. यात शहरातील रुग्णांची संख्या फक्त २ हजार ७८५ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ हजार ६५९ आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात राेज अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तर शहरात रुग्ण कमी होत असल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडणे आदींमुळे शहरात कोरोना आटोक्यात येत असल्याची स्थिती आहे.

३६ दिवसांत १० हजारांवरून २ हजारांवर३१ मार्च रोजी शहरात १० हजार ९१५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी २ हजार ७८५ झाली. त्या उलट ग्रामीण भागात ३१ मार्च रोजी ४ हजार ६५५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी ६ हजार ६५९ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

ब्रेक द चेन, लसीकरण, स्वयंशिस्तीचा फायदाब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. परंतु आपल्याला गाफील राहता येणार नाही. धोका अजूनही आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी आरोग्य सुविधेत सुधारणा, आणखी वैद्यकीय सुविधेच्या इमारती, नागरिकांत त्रिसूत्रीबद्दल आणखी जागरूकता आणि स्वयंशिस्त, तसेच लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमुळे पुढील लाटेत औरंगाबाद शहर, नागरिक सुरक्षित राहतील.-आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त

शहराचा रिकव्हरी रेट-९४.५२ टक्केशहरात असा घसरला आलेखतारीख नवे रुग्ण- उपचार घेणारे रुग्ण२६ एप्रिल- ४९७ -४९४८२७ एप्रिल- ५९४             - ४७८३२८ एप्रिल- ५३०             - ४७०५२९ एप्रिल- ४५६ - ४४४९३० एप्रिल- ४२९             -४३०९१ मे- ४८२             - ४१७१२ मे- ३७३             - ४०१८३ मे- ३२०             - ३६३२४ मे- ३७४             - ३१४६५ मे- ३८१             - २७८५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद