Corona Virus in Aurangabad : शहरात १४, ‘ग्रामीण’मध्ये ४५ नवे कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:53 IST2021-06-28T11:51:02+5:302021-06-28T11:53:46+5:30
Corona Virus in Aurangabad : उपचारानंतर १०८ जणांना सुट्टी देण्यात आली

Corona Virus in Aurangabad : शहरात १४, ‘ग्रामीण’मध्ये ४५ नवे कोरोना रुग्ण
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ५९ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १४, तर ग्रामीण भागातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ९८२ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागातील ८६, अशा १०८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.
उपचार सुरू असताना, कसाबखेडा, खुलताबाद येथील ५० वर्षीय महिला, देवगाव रंगारी, कन्नड येथील ७५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, गांधेली येथील ५५ वर्षीय पुरुष आणि चाळीसगाव, जळगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
शासकीय कर्करोग रुग्णालय १, हनुमाननगर १, गारखेडा १, चिकलठाणा १, मल्हार चौक ३, यशवंतनगर, बीड बायपास १, नारेगाव १, मयूर पार्क १, एन-९, सिडको १, एन-४ सिडको १, अन्य २.
ग्रामीण भागातील रुग्ण
कोटनांद्रा ता. सिल्लोड १, अन्य ४४.