शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लाॅकडाऊनचा आंतरजातीय विवाहांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:11 IST

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत असले तरी अजूनही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देकेवळ ९ जोडप्यांची नोंद  नोंदणी पद्धतीने जुळल्या २४६ रेशीमगाठी

- योगेश पायघन

औरंगाबाद : आंतरजातीय विवाहांची संख्या तुलनेत दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लाॅकडाऊनचा फटका या विवाहांनाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षात नोंदणी पद्धतीने २४६ विवाह पार पडले. त्यापैकी केवळ ९ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला असून, हे प्रमाण ३.६५ टक्के इतके आहे.

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत असले तरी अजूनही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसून येत नाही. या विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातून ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य प्रोत्साहन म्हणून दिले जाते. दरवर्षी या योजनेच्या लाभार्थींचा आलेख वाढता दिसतोय. मात्र, यंदा लाॅकडाऊनमुळे केवळ ९ प्रस्तावच दाखल झाल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवप्रसाद केंद्रे यांनी दिली. 

आर्थिक साहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळ२०१९ मध्ये नोंदणी पद्धतीने झालेल्या विवाहांचा आकडा २०१८ पेक्षा अधिक होता. ४९५ विवाह नोंदणी पद्धतीने लागले होते. त्यापैकी ७८ विवाह आंतरजातीय होते. त्याचे प्रमाण १५.७५ टक्के झाले होते. त्या जोडप्यांना जि. प.कडून प्रोत्साहन योजनेतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही केली होती. यावर्षी ९ प्रस्ताव दाखल झाले होते. ते वित्त विभागाकडे पाठविल्याचे केंद्रे म्हणाले. 

याेजनेचा लाभ कोणाला?दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या जोडप्यांच्या लग्नालाही प्रोत्साहन दिले जाते. मात्र, अनेकांना या योजनांबद्दल माहिती नसते. किंवा त्यांना मदत नको असते. अशा नोंदी होत नाही; पण या योजनेचा प्रसार समाजात झाल्यास योजनेचा मूळ उद्देश यशस्वी होईल, असेही ते म्हणाले, तर दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी विवाहात जाती-धर्माचे वर्गीकरण केले जात नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या