शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मागील ११ महिन्यांमध्ये घाटी रुग्णालयात कोरोनाने १,०७३ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:01 IST

Death due to Corona कोरोनाचा गंभीर रुग्ण म्हटला की, ग्रामीण भागातील रुग्णालये असोत की, खासगी रुग्णालये, सरळ घाटीत रेफर केले जाते.

ठळक मुद्दे औरंगाबाद जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील रुग्ण गंभीर अवस्थेत रेफर

औरंगाबाद : कोरोनाच्या ३ हजारांवर गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयाने मृत्यूच्या तावडीतून बाहेर आणले. मात्र, दुर्दैवाने गेल्या ११ महिन्यांत येथे औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील तब्बल १,०७३ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोनाचा गंभीर रुग्ण म्हटला की, ग्रामीण भागातील रुग्णालये असोत की, खासगी रुग्णालये, सरळ घाटीत रेफर केले जाते. कोरोना महामारीत गंभीर रुग्णांवर उपचार करणारे एकमेव शासकीय रुग्णालय म्हणून घाटीचा गोरगरीब रुग्णांना आधार मिळत आहे. घाटीत ५ एप्रिल रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू मराठवाड्यातील पहिला कोरोना बळी ठरला होता. जिल्ह्यात १२ मे २०२० पर्यंत कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर म्हणजे १३ मेपासून तब्बल सहा महिने नोव्हेंबरपर्यंत रोज मृत्यू होत गेले. या कालावधीत घाटीत सर्वधिक मृत्यू हे सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात १९७ रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा कोरोना रुग्णांची आणि त्यातही गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्णांना खाटाही मिळणे अवघड झाले होते. आता गेल्या महिन्याभरापासून पुन्हा अशीच अवस्था झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या १६ दिवसांतच घाटीत तब्बल ७९ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. यात औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे.

ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ ऑक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येतात. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर ऑक्सिजन पातळी असलेले दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टेज-५ मधील आहे. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास ऑक्सिजन लवकर देता येते. गंभीर रुग्णासाठी ऑक्सिजन अधिक फायदेशीर ठरतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

घाटीतील मृत्यूची स्थितीकालावधी                         मृत्यू५ एप्रिल ते ३० जून - २०४१ ते ३१ जुलै -             १५५१ ते ३१ ऑगस्ट-             १६७१ ते ३० सप्टेंबर-             १९७१ ते ३१ ऑक्टोबर-             १०७१ ते २९ नाेव्हेंबर -             ५५३० नाेव्हेंबर ते ३१ डिसेंबर-             ४९१ ते ३१ जानेवारी -                         २९१ ते २८ फेब्रुवारी-                         ३११ ते १६ मार्च-                         ७९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद