शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 7:18 PM

महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

ठळक मुद्देशिवसेनेचीही स्वबळावर तयारी भारतीय जनता पक्षामध्येही उत्सुकता 

औरंगाबाद : महापालिका निवडणुका केव्हा होणार हे सर्वाेच्च न्यायालयातील निकालानंतरच  स्पष्ट होणार असले तरी काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. 

देशमुख यांचे विधान पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती देण्यासाठी असू शकते. त्यांनी स्वबळाची भाषा जरी केली असली तरी निर्णय तर वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे मत शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी आहे. औरंगाबाद महापालिकेत एप्रिल २०२० पर्यंत शिवसेना-भाजप सत्तेत होते. ११५ नगरसेवकांच्या आकड्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० ते १२ नगरसेवक होते. सोबत एमआयएमचे २६ नगरसेवक होते. उर्वरित सत्तेचा आकडा शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. मनपाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता आहे. 

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक कधी होईल, हे स्पष्ट होणार असले तरी कार्यकर्त्यांमध्ये जीव ओतण्याच्या भूमिकेतून शिवसेना आणि काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपसमोर पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित जाण्याचे मनसुभे ठेवलेले असताना काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार जरी असले तरी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही आघाडी होणार की नाही, याबाबत आता आघाडीतील तिन्ही पक्षांसह भाजपमध्येही उत्सुकता आहे. 

संपर्कमंत्री देशमुख म्हणाले होते...काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी स्वबळावरच लढते. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकादेखील काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत्त आहेत. मग तीच आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम न राहण्यामागे नेमके कारण काय आहे, यावर संपर्कमंत्री देशमुख यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर निवडणूक लढण्याची असल्याचे सांगितले होते. 

आम्हीही ११५ वार्डांची तयारी केली आहेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, काँग्रेसचे मंत्री देशमुख यांचे मत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यासाठी असेल. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेनेदेखील ११५ वॉर्डांमध्ये पूर्ण क्षमतेने वॉर्डनिहाय बैठका घेत तयारी केली आहे. 

...तर राष्ट्रवादीही स्वबळावरचराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजयराज साळवे यांनी सांगितले, महाविकास आघाडी होण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. महाविकास आघाडीत निवडणूक होईल; पण काँग्रेस जर स्वबळाची भाषा करीत असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्हीदेखील ११५ वॉर्डांमध्ये बैठकांसह आढावा घेत तयारी केली आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस