शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 11:26 IST

प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादला आल्यानंतर त्यात एल्गार यात्रा विलीन होईल

औरंगाबाद : येत्या २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा सुरू होत आहे. सुभेदारी गेस्ट हाऊसजवळील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यास दुपारी २ वाजता अभिवादन करून या यात्रेचा प्रारंभ होईल. ही यात्रा सरकारची पोलखोल करीत व जनतेचे प्रश्न मांडत जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये व वॉर्डावॉर्डात जाईल, अशी माहिती आज येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रपरिषदेत दिली. 

त्यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकांची ही तयारीच असून, नंतर ही यात्रा प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादला आल्यानंतर त्यात विलीन होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीमुळे बसलेला फटका, पेट्रोल- डिझेलची रोजच होणारी दरवाढ, अयशस्वी झालेली कर्जमाफी, दिलेल्या आश्वासनांची न केलेली परिपूर्ती, असे असंख्य मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी मूळ प्रश्न बाजूला ठेवून मतांसाठी सातत्याने कसे सामाजिक व धार्मिक तेढ वाढवली, याचीही आम्ही पोल खोलू. या यात्रेचा मुक्काम त्या- त्या गावच्या शाळा परिसरात किंवा मंदिरात राहील. यानिमित्ताने आम्ही काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यातून बुथ कमिट्यांचे गठनही करू. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, डॉ. पवन डोंगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ही मॅच फॅक्सिंग हैदराबादेत झालीओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची मॅच फिक्सिंग हैदराबादेत झाली. त्याचा पर्दाफाशही मी या यात्रेत करणार आहे. काँग्रेस महाआघाडीसाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सक्रिय झाले आहेत. सध्या बैठकांवर बैठका चालू आहेत. एमआयएम व मनसे या जातीयवादी पक्षांशी आघाडी करायचीच नाही, असा निर्णय झालेला आहे. पण प्रकाश आंबेडकर यांना बहुजन वंचित आघाडीचा उद्देशच समजलेला नाही. काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. प्रकाश आंबेडकर यांची अचानक एमआयएमशी आघाडी झाली. त्याचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. एमआयएम कुणासाठी काम करते हे सर्वांना माहीत आहे. त्यात आता भारिप-बहुजन महासंघाची भर पडली म्हणावी लागेल, असे आ. सत्तार म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन