शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:27 IST

देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनितीन राऊत : युद्ध नको बुद्ध हवा

औरंगाबाद : देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.बौद्ध महिला धम्म परिषदेसाठी ते आले होते. त्यांनी सांगितले, राहुल गांधी यांनी आदेश दिल्यास रामटेक लोकसभा लढायला मी तयार आहे. माझी यंत्रणा सज्ज आहे.औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला वातावरण अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राऊत यांनी आज औरंगाबाद व जालना येथील कार्यकर्त्यांचीही मते जाणून घेतली. उमेदवार कोण असावा याचीही चाचपणी त्यांनी केली. औरंगाबाद काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत राष्टÑवादीला सोडू नये, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांची असून ती मी पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचवीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. राऊत म्हणाले, युद्ध ओढवून घेण्यासारखी आज स्थिती नाही. युद्ध नको बुद्ध हवा हेच खरे.२६ नोव्हेंबरपासून ‘संविधान से स्वाभिमान’हा कार्यक्रम आमच्या विभागामार्फत सुरू आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन मेळावे घेतले जात आहेत. दलित शक्ती नावाने पोर्टल सुरू केले असून, त्यात दलित युवकांची नोंदणी केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका दलित विरोधी आहे. त्यामुळे दलित समाज दुखावला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी रवींद्र दळवी, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, मनीष वाघमारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.-------------

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNitin Rautनितीन राऊत