शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विभागीय प्रशासनाची मजबुरी; कंपन्यांच्या हाती पीक विम्याची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 7:08 PM

कंपन्यांची पीकविमा देण्याबाबत अजून हालचाल नाही

ठळक मुद्दे७६ तालुक्यांतील अहवाल तयार

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांकडून पीक विम्यापोटी अजून काहीही पडलेले नाही. विभागीय आयुक्त प्रशासनाने पूर्णत: ७६ तालुक्यांतील नुकसान आणि विम्याची सरासरी याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, याबाबत सांख्यिकी विभाग आणि विमा कंपन्यांना निर्णय घ्यायचा आहे. सदरील यंत्रणेने अजून तरी काहीही निर्णय घेतलेला नाही. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पंधरवड्यात मराठवाड्यात १६ हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, तसा निर्णय अजून तरी झालेला नाही. ३३८ कोटी रुपयांची रक्कम आठ विमा कंपन्यांकडे भरली आहे. त्यातून १४ हजार ४७७ कोटी रुपये ही रक्कम विमा संरक्षणाची आहे. सरलेल्या खरीप हंगामात अंदाजे ३९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली होते.

विभागीय आयुक्तांनी विमा कंपन्यांची झाडाझडती घेतल्यानंतरही त्या कंपन्यांनी अजून मोबदला देण्याबाबत सुरुवात केली नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. पीक विमा योजना केंद्राच्या अखत्यारीत आहे. योजनेचे कामकाज पुण्यातील सांख्यिकी विभागप्रमुखांच्या अंतर्गत चालते. जोपर्यंत तेथून काही निर्णय होत नाही, तोवर शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही, असे बोलले जात आहे. मराठवाड्यातील सुमारे १ लाखांहून अधिक एकर जमिनीवरील खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली असून, सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांच्या रबी हंगामाची मदार आहे. ८१९ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली. ३,३५० कोटींच्या मागणीच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना राज्य, केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा सध्या आहे. 

७६ तालुक्यांतील क्लेम कृषी आयुक्तांकडे पहिल्या टप्प्यातील अनुदान पूर्णपणे वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अजून प्राप्त झालेले नाही. विमा कंपन्यांचे क्लेम सगळे कृषी आयुक्तांकडून जात आहेत. पूर्ण जिल्ह्यातून ते पाठविले जात आहेत. ७६ तालुक्यांतील क्लेम जेडीएमार्फत कृषी आयुक्त व आयुक्तांकडून कंपन्यांकडे पाठविले जात आहेत. विमा कंपन्यांना अहवाल देण्याचे काम प्रशासनाने १०० टक्के केले आहे. विमा कंपन्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्या किती तत्परतेने विमा मोबदला वाटप करतील याबाबत प्रशासन सांगू शकणार नाही.- पराग सोमण, महसूल उपायुक्त, औरंगाबाद विभाग 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी