शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवाला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: May 14, 2014 23:53 IST

हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

हिंगोली : लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यात ठेवलेल्या धान्य व फळे महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. फळांत आंबा तर धान्यात भाजीपाल्यांचा बोलबाला राहिला. काही स्टॉल्सवर डाळी तर काही स्टॉल फळांपासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे दिसून आले. बाजाराचा दिवस लक्षात घेवून भरविलेल्या या महोत्सवाला जिल्हावासियांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी-विक्री होण्याची अपेक्षा कृषी विभागाची होती; परंतु महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. बहुताश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते. ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य महोत्सवात दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त होता. कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला जात होता. महोत्सवात सर्वाधिक आंब्याची विक्री झाली. कारण बाजारात आंब्याचे अधिक भाव आणि हमीचा आंबा मिळेनासा झाला. काही जणांनी सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी आणले होते. कुदरत जातीचे असलेले बियाणे पेरणीऐवजी लागवड करण्यासाठी फायदेशीर असल्याचे एकनाथ हिंगमिरे यांनी सांगितले. गतवर्षी एका एकरात ५ किलो बियाण्याला १८ पोत्यांचा उतार आल्याचे त्यांनी सांगितले. कापसाच्या बियाण्यातील बोलगार्ड कंपनीचा एकमेव स्टॉल दिसून आला. स्टॉलवर जावून विचारपूस करण्याची तसदी देखील शेतकर्‍यांनी घेतली नाही. बाजारात दुप्पटीपेक्षा कमी दराने डाळी रमेश पंडित यांनी महोत्सवात विकल्या. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये दर ठेवला होता. दुसरीकडे फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्‍या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. दिवसेंदिवस लुप्त होत असलेल्या घोंगडी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. बर्‍यापैकी प्रतिसाद या स्टॉलला मिळाला. पुस्तकांच्या स्टॉलने देखील अनेकांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या संयुक्त विद्यमाने रामलीला मैदानावर १३ व १४ मे दरम्यान धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिलाच प्रयोग असलेल्या या महोत्सवाला मध्यम प्रतिसाद मिळाला. धान्याऐवजी भाजीपाल्याचे स्टॉल अधिक दिसून आले. तसेच बहुतांश स्टॉल फळांपासून बनविलेल्या पदार्थांचे होते; परंतु ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी धान्य दिसून आले नाहीत. फळांमध्ये आंब्याच्या पलीकडे इतर फळे दृष्टीस पडली नाहीत. कच्चे आणि पिकलेले आंब्याचे स्टॉल अधिक प्रमाणात होते. मात्र बाजाराच्या तुलनेत येथील केसर आंबा स्वस्त असून कच्चा आंबा ४० रूपये तर पिकलेला आंबा ८० रूपये किलो दराने विकला गेला. फळांपासून विविध पदार्थ तयार करणार्‍या जालना येथील एका कंपनीचा स्टॉल लक्षवेधी ठरला. तूर दाळ ४० तर १ किलो बेसनच्या पॅकसाठी ४० रूपये होता दर.