शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST

उमरगा : तालुक्यात खरिपाच्या एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या.

उमरगा : तालुक्यात खरिपाच्या एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, बहुतांश क्षेत्रात पेरलेले उगवलेच नसल्याने तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.तालुक्यात खरिपाचे एकूण ७२ हजार २०० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. खरीप पेरणीमध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मुग, सोयाबीन, संकरित ज्वारीचा पिकांचा समावेश असतो. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसांपासून पेरणीस प्रारंभ केला आहे. उमरगा, मुरुम, मुळज, नारंगवाडी, दाळींब या कृषी विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याला यावर्षी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. परंतु, पेरणी झालेल्या काही क्षेत्रातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग या उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने या कोवळ्या पिकांची वाढ खुंटू लागली असून, कुंभारीवारा व कडक ऊन यामुळे उगवलेली पिके धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत फक्त १३१.६० मि.मी. पाऊस झाला आहे. झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सरासरी ६ हजार ९१० हेक्टर क्षेत्रापेक्षा ३१९.२४ हेक्टर क्षेत्रात २३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहेत. तर तालुक्यातील ७० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या लेखी तक्रारी येथील तालुका कृषी कार्यालयाकडे केल्या आहेत. १५० एकर क्षेत्रातील पेरण्यात आलेले सोयाबीन उगवले नसल्याची प्राथमिक माहितीची नोंद झाली असली तरी या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याची शक्यता पुढे येत आहे.तीन समित्यांमार्फत पंचनामेपेरणी करुन उगवून न आलेल्या तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, बियाणे प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी, कृषी सहायक अशा सहा सदस्यीय तपासणी पथकाच्या एकूण तालुक्यात तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. येथील तालुका कृषी कार्यालयाकडे दाखल झालेल्या एकूण ६० तक्रारींचे पंचनामे या समितीमार्फत करण्यात येऊन अहवाल कार्यालयास दाखल केला आहे. (वार्ताहर)पेरणी यंत्राचा प्रयोग यशस्वीशेतमजुरांची बचत होऊन पेरणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने तालुक्यातील १६२ शेतकऱ्यांना अनुदानित १६२ पेरणी यंत्रे मंजूर झाली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४८ शेतकऱ्यांना पेरणी यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी यंत्राद्वारे केलेल्या पेरणीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे कृषी अधिकारी हणमंत गोरे यांनी सांगितले.तात्काळ तक्रारी दाखल करायावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उगवण क्षमतेत घट झाली आहे. काही भागातील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांच्या पेरणी क्षेत्राचे विनाविलंब पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयाला तात्काळ लेखी तक्रार अर्ज करावेत, तक्रारदार शेतकऱ्यांच्या बियाणे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत. तसेच पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा भरणा करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे, मंडल कृषी अधिकारी मुरली जाधव यांनी केले आहे.नुकसान भरपाई तात्काळ द्यातूर, सोयाबीन, हायब्रीड, ज्वारीची पेरणी केलेल्या न उगवलेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना आ. ज्ञानराज चौगुले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.