शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दिलासादायक ! उद्योगांनी मरगळ झटकली; ८० टक्के उत्पादन क्षमतेकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 3:22 PM

Leap to 80% production capacity in Aurangabad Industrial Area आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतींनी लॉकडाऊनची मरगळ झटकलीबहुतांश उद्योगांकडे डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर उपलब्ध

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून औरंगाबादच्या पाचही औद्योगिक वसाहतींतील बहुतांश उद्योगांनी ८० टक्के, तर काहींनी त्यापेक्षा जास्त उत्पादन क्षमतेकडे झेप घेतली आहे. 

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे औरंगाबादसह देशभरातील उद्योग, बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. राज्य सरकारने ‘अनलॉक’ घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने साधारणपणे जूनपासून औरंगाबादच्या उद्योगांची यंत्रे फिरू लागली. बंद असलेल्या देश-विदेशातील बाजारपेठा, कुशल मनुष्यबळाचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ऑर्डरचे घटलेले प्रमाण या साऱ्या बाबींमुळे जुलै-ऑगस्टपर्यंत उद्योगांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले. प्रयत्न करूनही ५०-५५ टक्क्यांपुढे उत्पादन क्षमता जात नव्हती.

अलीकडे, हळूहळू बाजारपेठा सुरू होत असून उत्पादनांना चांगली मागणी आहे. दुसरीकडे दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असल्यामुळे उद्योग क्षेत्राने कात टाकली आणि आता बहुतांश उद्योगांची उत्पादन क्षमता जवळपास ८० टक्के, तर ऑटोमोबॉईल, फार्मास्युटीकल, अन्नप्रकिया, बीअर आदी  उद्योगांची १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता पोहोचली आहे. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांकडेही डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर आहेत. असे असले, तरी अजून आंतरराज्य रेल्वेवाहतूक सुरू झालेली नसल्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गावी गेलेले फक्त २० टक्के परप्रांतीय कामगार परत येऊ शकले आहेत. त्यामुळे उद्योगांसमोर सध्या तरी कुशल कामगारांची टंचाई आहे. तूर्तास स्थानिक कामगारांना प्रशिक्षित करून त्यांच्या आधारे उद्योगांचा कारभार सुरू असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसतेययासंदर्भात ‘सीएमआयए’चे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट होते. उद्योग जरी हळूहळू सुरू झाले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठा उघडलेल्या नव्हत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चाललेले होते. शासन-प्रशासन आणि उद्योगांनी त्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना आखल्या. कोरोनाची भीती आता बऱ्यापैकी कमी झाली. कामगार कामावर यायला लागले. आता नवीन वर्षापर्यंत बहुतांश सर्व उद्योगांकडे ऑर्डर असून आता उत्पादन क्षमताही ८० टक्के व त्यापुढे पोहोचली आहे. परिणामी, आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक