शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

दिलासादायक ! उद्योगांनी मरगळ झटकली; ८० टक्के उत्पादन क्षमतेकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 15:37 IST

Leap to 80% production capacity in Aurangabad Industrial Area आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतींनी लॉकडाऊनची मरगळ झटकलीबहुतांश उद्योगांकडे डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर उपलब्ध

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून औरंगाबादच्या पाचही औद्योगिक वसाहतींतील बहुतांश उद्योगांनी ८० टक्के, तर काहींनी त्यापेक्षा जास्त उत्पादन क्षमतेकडे झेप घेतली आहे. 

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे औरंगाबादसह देशभरातील उद्योग, बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. राज्य सरकारने ‘अनलॉक’ घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने साधारणपणे जूनपासून औरंगाबादच्या उद्योगांची यंत्रे फिरू लागली. बंद असलेल्या देश-विदेशातील बाजारपेठा, कुशल मनुष्यबळाचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ऑर्डरचे घटलेले प्रमाण या साऱ्या बाबींमुळे जुलै-ऑगस्टपर्यंत उद्योगांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले. प्रयत्न करूनही ५०-५५ टक्क्यांपुढे उत्पादन क्षमता जात नव्हती.

अलीकडे, हळूहळू बाजारपेठा सुरू होत असून उत्पादनांना चांगली मागणी आहे. दुसरीकडे दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असल्यामुळे उद्योग क्षेत्राने कात टाकली आणि आता बहुतांश उद्योगांची उत्पादन क्षमता जवळपास ८० टक्के, तर ऑटोमोबॉईल, फार्मास्युटीकल, अन्नप्रकिया, बीअर आदी  उद्योगांची १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता पोहोचली आहे. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांकडेही डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर आहेत. असे असले, तरी अजून आंतरराज्य रेल्वेवाहतूक सुरू झालेली नसल्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गावी गेलेले फक्त २० टक्के परप्रांतीय कामगार परत येऊ शकले आहेत. त्यामुळे उद्योगांसमोर सध्या तरी कुशल कामगारांची टंचाई आहे. तूर्तास स्थानिक कामगारांना प्रशिक्षित करून त्यांच्या आधारे उद्योगांचा कारभार सुरू असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसतेययासंदर्भात ‘सीएमआयए’चे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट होते. उद्योग जरी हळूहळू सुरू झाले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठा उघडलेल्या नव्हत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चाललेले होते. शासन-प्रशासन आणि उद्योगांनी त्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना आखल्या. कोरोनाची भीती आता बऱ्यापैकी कमी झाली. कामगार कामावर यायला लागले. आता नवीन वर्षापर्यंत बहुतांश सर्व उद्योगांकडे ऑर्डर असून आता उत्पादन क्षमताही ८० टक्के व त्यापुढे पोहोचली आहे. परिणामी, आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक