शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

दिलासादायक ! उद्योगांनी मरगळ झटकली; ८० टक्के उत्पादन क्षमतेकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 15:37 IST

Leap to 80% production capacity in Aurangabad Industrial Area आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतींनी लॉकडाऊनची मरगळ झटकलीबहुतांश उद्योगांकडे डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर उपलब्ध

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून औरंगाबादच्या पाचही औद्योगिक वसाहतींतील बहुतांश उद्योगांनी ८० टक्के, तर काहींनी त्यापेक्षा जास्त उत्पादन क्षमतेकडे झेप घेतली आहे. 

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे औरंगाबादसह देशभरातील उद्योग, बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. राज्य सरकारने ‘अनलॉक’ घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने साधारणपणे जूनपासून औरंगाबादच्या उद्योगांची यंत्रे फिरू लागली. बंद असलेल्या देश-विदेशातील बाजारपेठा, कुशल मनुष्यबळाचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ऑर्डरचे घटलेले प्रमाण या साऱ्या बाबींमुळे जुलै-ऑगस्टपर्यंत उद्योगांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले. प्रयत्न करूनही ५०-५५ टक्क्यांपुढे उत्पादन क्षमता जात नव्हती.

अलीकडे, हळूहळू बाजारपेठा सुरू होत असून उत्पादनांना चांगली मागणी आहे. दुसरीकडे दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असल्यामुळे उद्योग क्षेत्राने कात टाकली आणि आता बहुतांश उद्योगांची उत्पादन क्षमता जवळपास ८० टक्के, तर ऑटोमोबॉईल, फार्मास्युटीकल, अन्नप्रकिया, बीअर आदी  उद्योगांची १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता पोहोचली आहे. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांकडेही डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर आहेत. असे असले, तरी अजून आंतरराज्य रेल्वेवाहतूक सुरू झालेली नसल्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गावी गेलेले फक्त २० टक्के परप्रांतीय कामगार परत येऊ शकले आहेत. त्यामुळे उद्योगांसमोर सध्या तरी कुशल कामगारांची टंचाई आहे. तूर्तास स्थानिक कामगारांना प्रशिक्षित करून त्यांच्या आधारे उद्योगांचा कारभार सुरू असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसतेययासंदर्भात ‘सीएमआयए’चे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट होते. उद्योग जरी हळूहळू सुरू झाले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठा उघडलेल्या नव्हत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चाललेले होते. शासन-प्रशासन आणि उद्योगांनी त्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना आखल्या. कोरोनाची भीती आता बऱ्यापैकी कमी झाली. कामगार कामावर यायला लागले. आता नवीन वर्षापर्यंत बहुतांश सर्व उद्योगांकडे ऑर्डर असून आता उत्पादन क्षमताही ८० टक्के व त्यापुढे पोहोचली आहे. परिणामी, आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक