शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:11 PM

कुलगुरूंच्या आदेशानंतर पीएच.डी. विभागाने काढले परिपत्रक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात होणाऱ्या पीएच.डी. मौखिक चाचणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जेवणावळी द्याव्या लागतात. या जेवणावळी तात्काळ बंद करण्यात याव्यात, असे परिपत्रक पीएच.डी. विभागाने काढले आहे.  

मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस् (मास) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेत पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेनंतर होणाऱ्या जेवणावळीकडे लक्ष वेधले. संशोधकांचा व्हायवा मोठा सोहळा असतो. मौखिक चाचणीचे परीक्षक, मार्गदर्शक आणि विभागप्रमुख यांच्या भोजनाची जबाबदारी संशोधकाला उचलावी लागते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतात. परीक्षक विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये न राहता महागड्या हॉटेलात राहतात. यामुळे संशोधक विद्यार्थ्याला ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. मौखिक चाचणी ही परीक्षाच असल्यामुळे तेथे हे प्रकार कसे घडतात, असा सवाल करीत मास संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंसमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

विद्यापीठाच्या कामकाजातील त्रुटी दूर करा, पीएच.डी. विभागात तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नेमा, वसतिगृह आणि अभ्यासिकेत सुरळीत पाणीपुरवठा करा, गाईडशिपची यादी अपडेट करणारी यंत्रणा विकसित करा, संशोधन विभागातील काम किती दिवसांत होईल, याची माहिती देणारे बोर्ड लावा, अशी मागणीही करण्यात आली. सध्या पीएच.डी. विभागात एकही काम तात्काळ होत नाही. व्हायवा झाल्यानंतर तात्काळ नोटिफिकेशन मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना शिष्टमंडळाने केली. त्यावर सकाळच्या सत्रात व्हायवा आणि सायंकाळपर्यंत नोटिफिकेशन देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सचिन बोराडे, अमित कुटे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, दिगंबर जाधव, अजय पवार, आदित्य मुठ्ठे, विजय चिंचाणे यांचा समावेश होता. सूचनांची दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ पीएच.डी. विभागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तसेच जेवणावळी, हार, पुष्पगुच्छ देणे-घेणे येऊ बंद करावे, असे परिपत्रक काढले.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे?विद्यापीठ यंत्रणेने कामकाज सुरळीत केल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही; पण काम सुरळीत होत नाही. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न डॉ. उढाण यांनी केला. कोणतेही काम निर्धारित वेळेत आणि पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद