शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्वी स्वच्छता आवश्यक

By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST

हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे.

 हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे. अस्वच्छतेमुळे पावसाळ्यापूर्वी शहराची स्वच्छता हाती घेणे महत्वाचे आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वी नगरपरिषदेने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील नाल्या व गटारी तुंबल्या असल्याने जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतागृहांचे आऊटलेट नाल्यात सोडून दिले आहेत. नाल्या तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांच्या चाव्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. उकंड्यावर डुकरे व त्यांच्या पिलांचा मुक्त संचार वाढल्यामुळे स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. दसर्‍यासाठी राखीव असलेल्या रामलीला मैदानावर सर्वात मोठा उकंडा व कचरा डेपो तयार झाला आहे. जुने ग्रामीण पोलिस ठाणे, भाजी - मंडई, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, पेन्शनपुरा, मंगळवारा, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, तलाब कट्टा आदी भागात कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कचराकुंड्यांचा वापर नागरिक करण्याची गरज असताना अनेकजण ते टाळताना दिसतात व बेजबाबदारपणे वागतात. जुन्या शहरातील तोफखाना, मंगळवारा, भोईपुरा, कोमटी गल्ली, कासारवाडा, कुंभारवाडा, मंगळवारा, गाडीपुरा, पेशनपुरा, आंबिका टॉकीजजवळील भाग, भाजी मंडी, पोस्ट आॅफीस रोड, सिद्धार्थनगर आदी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नाल्या व गटारी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षाने सफाई कामगार थातूरमातूर नाल्या उपसून आपले कर्तव्य बजावतात. मुसळधार पावसामुळे गल्लीबोळात गटाराचे पाणी अनेक घरांत शिरते. आता मान्सून जवळ आला आहे म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. नाल्या व गटारी तळापासून उपसण्याची गरज आहे. डासांच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी किटकनाशक व धूरफवारणी करण्याची आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने नियोजन व अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)