शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:34 IST

आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश, राज्य, जिल्ह्यातील विकासांच्या मुद्याऐवजी महापालिका हद्दीतील नागरी सुविधांवर जास्तीचा भर देऊन विरोधकांनी प्रचार केल्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात ऐरणीवर ठेवला होता. परिणामी मोठा पराभव होऊनही मनपातील सत्ताधारी युतीला जाग येत नाही. आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

महिन्यातून फक्त चार दिवस काही वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. पाणीपट्टी वर्षभराची आणि पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा, असा प्रकार पालिकेकडून होत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे.

सिडको-हडकोत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या विद्युत तारांवर वीज पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तेथे दुरुस्ती केली. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले.

जायकवाडी धरणातून १५५ ऐवजी १३५ एमएलडी पाणी उपसा सुरू होता. गळत्यांवर मात करीत ११५ ते १२० एमएलडीच पाणी शहराला येते. दोन महिन्यांत २० एमएलडी पाणी कमी झाल्यामुळे अनेक भागांत उशिरा पाणीपुरवठा होतो आहे.

गुंठेवारी वसाहतींनी काय करावेशहरातील ११९ पैकी ५० टक्के गुंठेवारी वसाहतींमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. त्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. नळांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे टँकरच्या फेऱ्यादेखील लांबणीवर पडत आहेत. गुंठेवारी भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. ड्रमभर पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहण्यापलीकडे या नागरिकांच्या हाती काहीही राहिलेले नाही.

पालिका अभियंत्यांचा दावा असा-जायकवाडी धरणातून पंपगृहांसाठी पाणी उपसा करण्याकरिता आपत्कालीन ६ तरंगते पंप बसविण्यात आले. त्यापैकी ५ पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळ्यात जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम होत असे. मनपा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्यामुळे पंप ट्रिपिंग होणे बंद झाले आहे. दरम्यान पाणीपुरवठा सुरुळीत झाल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात