शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:34 IST

आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश, राज्य, जिल्ह्यातील विकासांच्या मुद्याऐवजी महापालिका हद्दीतील नागरी सुविधांवर जास्तीचा भर देऊन विरोधकांनी प्रचार केल्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात ऐरणीवर ठेवला होता. परिणामी मोठा पराभव होऊनही मनपातील सत्ताधारी युतीला जाग येत नाही. आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

महिन्यातून फक्त चार दिवस काही वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. पाणीपट्टी वर्षभराची आणि पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा, असा प्रकार पालिकेकडून होत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे.

सिडको-हडकोत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या विद्युत तारांवर वीज पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तेथे दुरुस्ती केली. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले.

जायकवाडी धरणातून १५५ ऐवजी १३५ एमएलडी पाणी उपसा सुरू होता. गळत्यांवर मात करीत ११५ ते १२० एमएलडीच पाणी शहराला येते. दोन महिन्यांत २० एमएलडी पाणी कमी झाल्यामुळे अनेक भागांत उशिरा पाणीपुरवठा होतो आहे.

गुंठेवारी वसाहतींनी काय करावेशहरातील ११९ पैकी ५० टक्के गुंठेवारी वसाहतींमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. त्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. नळांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे टँकरच्या फेऱ्यादेखील लांबणीवर पडत आहेत. गुंठेवारी भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. ड्रमभर पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहण्यापलीकडे या नागरिकांच्या हाती काहीही राहिलेले नाही.

पालिका अभियंत्यांचा दावा असा-जायकवाडी धरणातून पंपगृहांसाठी पाणी उपसा करण्याकरिता आपत्कालीन ६ तरंगते पंप बसविण्यात आले. त्यापैकी ५ पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळ्यात जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम होत असे. मनपा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्यामुळे पंप ट्रिपिंग होणे बंद झाले आहे. दरम्यान पाणीपुरवठा सुरुळीत झाल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात