शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:34 IST

आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश, राज्य, जिल्ह्यातील विकासांच्या मुद्याऐवजी महापालिका हद्दीतील नागरी सुविधांवर जास्तीचा भर देऊन विरोधकांनी प्रचार केल्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात ऐरणीवर ठेवला होता. परिणामी मोठा पराभव होऊनही मनपातील सत्ताधारी युतीला जाग येत नाही. आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

महिन्यातून फक्त चार दिवस काही वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. पाणीपट्टी वर्षभराची आणि पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा, असा प्रकार पालिकेकडून होत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे.

सिडको-हडकोत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या विद्युत तारांवर वीज पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तेथे दुरुस्ती केली. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले.

जायकवाडी धरणातून १५५ ऐवजी १३५ एमएलडी पाणी उपसा सुरू होता. गळत्यांवर मात करीत ११५ ते १२० एमएलडीच पाणी शहराला येते. दोन महिन्यांत २० एमएलडी पाणी कमी झाल्यामुळे अनेक भागांत उशिरा पाणीपुरवठा होतो आहे.

गुंठेवारी वसाहतींनी काय करावेशहरातील ११९ पैकी ५० टक्के गुंठेवारी वसाहतींमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. त्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. नळांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे टँकरच्या फेऱ्यादेखील लांबणीवर पडत आहेत. गुंठेवारी भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. ड्रमभर पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहण्यापलीकडे या नागरिकांच्या हाती काहीही राहिलेले नाही.

पालिका अभियंत्यांचा दावा असा-जायकवाडी धरणातून पंपगृहांसाठी पाणी उपसा करण्याकरिता आपत्कालीन ६ तरंगते पंप बसविण्यात आले. त्यापैकी ५ पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळ्यात जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम होत असे. मनपा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्यामुळे पंप ट्रिपिंग होणे बंद झाले आहे. दरम्यान पाणीपुरवठा सुरुळीत झाल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात