शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

फसलेला प्रयोग शहरात

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे. ७० ते ८० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी आणि एलईडी बल्ब बसविण्याचे काम केले जाईल. एलईडीमध्ये वीज वाचेल आणि बल्बचा चांगला प्रकाश मिळेल, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.
पिंपरी- चिंचवड मनपात एलईडीचा प्रयोग फसला आहे. तेथे फसलेला प्रयोग औरंगाबाद मनपा का करीत आहे, असा प्रश्न आहे. वीनवॉक या नाशिक येथील कंत्राटदार कंपनीचा बीओटीवरील करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये टेंडर निघणार असे पालिकेने ठरविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोरियन तंत्रज्ञानाने बनविलेल्या बल्बची चाचणी सध्या सुरू असून आयुक्त डॉ. कांबळे यांचे निवासस्थान, सिद्धार्थ, नेहरू बालोद्यान आणि जालना रोडवरील पथदिव्यांवर ते बल्ब बसविण्यात आले आहेत.
उपअभियंत्यांना पदोन्नती
विद्युत विभागातील उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना सेवानिवृत्तीसाठी अंदाजे १ वर्ष बाकी आहे. तत्पूर्वी, त्यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एलईडी प्रकल्पासाठीच त्यांना पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
जुना वीज बचतीचा रेकॉर्ड नाही
वीनवॉक या संस्थेने एनर्जी सेव्हिंग फिटिंग दिली होती. त्यातून किती वीज वाचली, याचा रेकॉर्ड पालिकेच्या विद्युत विभागाकडे नाही. या प्रकरणी उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले, त्याचे कॅल्क्युलेशन करावे लागेल.
सहा कंपन्यांनी केला संपर्क
आजवर ६ कंपन्यांनी पथदिवे बसवून देण्याबाबत पालिकेशी संपर्क केला. त्या सर्व कंपन्यांनी बल्ब बसवून देणार असल्याचे सांगितले.
इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात त्या कंपन्यांनी रस दाखविला नाही. पालिकेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बल्ब बसवून देणारी कंपनी हवी आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये काय झाले
पिंपरी- चिंचवड मनपाने एलईडी फिटिंगचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी राबविला. ४ बाय २४ असा तो प्रकल्प होता. त्यामध्ये वीज बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
२५० ते २८० वॅटपर्यंच वीज त्या पथदिव्यांना लागली. पथदिवेनिहाय १५० ते १६० वॅटपर्यंत वीज लागल्याचे दाखविले गेले. त्यामध्ये पालिकेचे नुकसान होत असल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाने एचपीएसव्हीची फिटिंग करण्याचा निर्णय घेतला.