शहराने घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: May 27, 2014 00:58 IST2014-05-27T00:25:51+5:302014-05-27T00:58:58+5:30
उस्मानाबाद : सोमवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक जिल्हा परिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर दाखल झाले. आणि काही वेळातच वर्षानुवर्ष मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर सुरु झाला.

शहराने घेतला मोकळा श्वास
उस्मानाबाद : सोमवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक जिल्हा परिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर दाखल झाले. आणि काही वेळातच वर्षानुवर्ष मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर सुरु झाला. प्रशासनाने दिवसभरात सुमारे अडीचशेपेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली असून, शहराच्या अन्य भागात ही मोहीम उद्या मंगळवारीही सुरु राहणार आहे. प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील या मुख्य रस्त्याने खर्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झाले होते. या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी संबंधितांना नोटीसही बजावली होती. मात्र याकडे अतिक्रमणधारकांनी कानाडोळा केला. त्यानंतर रविवारी बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावली. बंद असलेल्या दुकानावरही याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळीच अतिक्रमणविरोधी पथक जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्यांनी शहरांसोबत ग्रामीण भागातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर पालिका, तहसील प्रशासन, तसेच बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, शिवाजी चौक, सांजा रोड आयुर्वेदीक महाविद्यालया पर्यंतची सुमारे २५० अतिक्रमणे सोमवारी हटविण्यात आली आहेत. पथक आल्याचे समजताच काहींनी स्वताहून अतिक्रमण अतिक्रमणे काढली. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंते, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) बार्शी नाका भागात आज मोहीम जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरुन सुरु झालेली ही कारवाई मंगळवारीही सुरु राहणार आहे. मंगळवारी शहरातील बार्शी नाका येथील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. अतिक्रमण हटविल्याने या मुख्य मार्गावर होणारी रहदारीची कोंडी कमी होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर अतिक्रमणधारकांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने बेरोजगारांसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता व्यक्त केली. तुळजापुरातही अतिक्रमणे जमीनदोस्त तुळजापूर : अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत सोमवारी न.प., महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे बसस्थानक परिसर, बसस्थानक रस्ता, भवानी रोड, दिपक चौक या परिसरातील कच्चे व पक्के अतिक्रमण हटविले. भवानी रोडवर दुकानदारांनी सावलीसाठी लावलेले पत्रे, जवाहर चौकासमोरील बीडकर तलावातील बोळातील, भाजीमंडई ते महाद्वार रस्ता या परिसरातील सर्व अतिक्रमणे आज हटविण्यात आली. मुख्याधिकारी राजीव बुबणे, अभियंता अशोक जगदाळे, अभियंता चव्हाण, स्वच्छता निरीक्षक शेख, अभियंता ढोबळे, तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार वाघे, पीएसआय चौधरी यांच्यासह न.प. कर्मचारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्थानक रस्त्यावर अतिक्रमण पथक आल्याचे समजताच भवानी रोडवर अतिक्रमणे केलेल्या व्यापार्यांनी आपापले अतिक्रमण स्वत:हून तात्काळ हटविले.