शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

‘उज्ज्वला’ योजनेतील गॅस रिफिलिंगसाठी नागरिकांच्या चकरा; मजूर, कामगार कुटुंबियांची होतेय अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 7:13 PM

गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : गोरगरिबांच्या घरीदेखील गॅस असावा म्हणून उज्ज्वला योजनेंतर्गत अनेकांना मोफत गॅस देण्यात आला. मात्र, आॅनलाईनची सुविधा नसल्याने तसेच गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

दारिद्ररेषेखालील नागरिकांना आधार कार्ड व कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस घरी आला म्हणून सामान्य मजूर आणि कष्टकऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता हा गॅस घेऊन अडचण झाल्याचे सामान्य नागरिकांना वाटत आहे. ज्या एजन्सीकडून गॅस कनेक्शन घेतले आहे, त्या एजन्सीतून गॅस आणण्यासाठी रिक्षाने ये-जा करावी लागते. यामध्ये गरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेक जण गॅस संपला म्हणून कार्ड घेऊन जातात. आॅनलाईन नोंद नसल्याने त्यांना सिलिंडर मिळत नाही. यामुळे रिकामे सिलिंडर घेऊन परत यावे लागते.

पुन्हा आठवडाभर मजुरी करून सुटीच्या दिवशी गॅस आणण्यासाठी नागरिक धाव घेत असल्याचे चित्र आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत दिवाळीला मिळालेल्या गॅसधारकांपैकी ५० टक्के लाभार्थ्यांचे सध्या तिसरे रिफिलिंग चालू आहे. घरपोच गॅस मिळत नाही आणि ठराविक मोबाईलवरून रिफिलिंगसाठी नोंदणी होते. अनेक लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे रिफिलिंग करता आलेले नाही. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळाल्याचा आनंद असला तरी सिलिंडर मिळत नसल्याने गरिबांची अडवणूक होत असल्याची भावना या योजनेतील गॅसधारकांनी व्यक्त केली.  

लाभधारकांची गैरसोय टाळामोलमजुरी करणाऱ्यांना सिलिंडर वेळेवर आणि घरपोच मिळत नाही, अनुदानही त्यांच्या खात्यात आले नाही. पुरवठा विभागाने त्याकडे लक्ष देऊन अनुदान पोहोच करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बांधकाम संघटनेचे सलीम शहा यांनी केली आहे. 

गॅसचे अनुदान द्याकधी मनातही वाटले नव्हते की आपणदेखील गॅस वापरू; परंतु मोफत गॅस कनेक्शन मिळाले त्याचा आनंद आहे. सध्या तिसरी रिफिलिंग आहे. अद्यापही त्याचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याचे मंदाबाई साखरे, रफिया बेग, मुमताज सय्यद, शशीकलाबाई साबळे आदींनी सांगितले.

गॅससाठी किती फेऱ्यामोबाईलवरून गॅसची बुकिंग करा तरच गॅस मिळेल, असे गॅस एजन्सीवाले सांगतात. रिक्षाने दोनदा १५ किलोमीटर जाऊन आलो. गॅस मिळाला नाही. गॅसची रिफिलिंग इतरांप्रमाणे घर पोहोच मिळावी, अशी मागणी मीनाबाई दुधाने यांनी केली. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWomenमहिलाFamilyपरिवार