शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 8:37 PM

महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल.

- राम शिनगारे  

औरंगाबाद : कवी आणि कविता म्हटलं की, एखाद्याचे मोठे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते. पृथ्वीसह आसमंत व्यापून टाकणारी त्याची शब्दरचना आपल्याला ठाऊक आहे.  महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. औरंगाबादजवळच्या भिंदोन शाळेत मात्र दप्तरातील कवी आहेत. हो हो.. दप्तरातील कवी. 

डोंगरात वसलेल्या भिंदोन या छोटेखानी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे दप्तरातील कवी आहेत. हे कवी म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थीच आहेत. अगदी चौथीच्या वर्गापासून ते सातवीपर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे कवी आहेत. विद्यार्थ्यांच्या या कवितांचा संग्रह नुकताच ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालाय. ‘दप्तरातील स्पंदन’ असे या कवितासंग्रहाचे नाव. विद्यार्थ्यांच्या ६० कविता ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी केला.  

शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भिंदोन हे गाव आहे. या गावात असलेल्या जि.प.च्या शाळेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतील विद्यार्थी कविता, कथा, नाटकांची रचना करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांपैकी काही कवितांची निवड करत ‘दप्तरातील स्पंदन’ हा छोटेखानी कवितासंग्रह शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेतून तयार केला. या कवितासंग्रहाचे नुकतेच प.सं. सदस्य अनुराग शिंदे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या बालकवीच्या जाणिवांचा विस्तार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे मातीशी ओलेपण जपणं पाण्याला सांगावं लागत नाही. त्याचप्रमाणे कविमनाचे शिक्षक असतील, तर स्वत:कडील गुण इतरांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. 

यातून शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना कवितांच्या रचना करण्यास प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थी कवितांच्या निर्मितीसाठी विचार करू लागले. मानवी जीवनातील संवेदनांच्या बिजारोपणास सुरुवात झाली. विज्ञानाच्या तंत्रासोबतच जगण्याचे मंत्रही आत्मसात करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत गेली असल्याचे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक विकास व्हावा, आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ कवींना लाजवेल, अशा प्रकारच्या कवितांची रचना केली असल्याचेही राऊत म्हणाल्या. शाळेतील सहकारी शिक्षक  कैलास गायकवाड, अरुणा ठाकुर, प्रतापसिंग जारवाल, रियाज मोहंमद शेख, संजय निकम, रेखा जारवाल, सुलभा मुळे, शिरोडकर, पल्लवी गजेवार, गणेश नलावडे आदींचे सहकार्य लाभले.

२५ मुले कविता करतातभिंदोनच्या शाळेतील २५ मुले कविता करतात. याशिवाय कथा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता तयार करतात, सामाजिक विषयांवरही लेखन करतात. विद्यार्थी जेव्हा लिहून दाखवतात. तेव्हा त्यातील चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जातात, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. प्रकाशित झालेल्या ग्रंथात वैशाली काकासाहेब क्षीरसागर (सातवी), शिवकन्या बद्रिनाथ शिंदे (सातवी), प्राजक्ता पांडुरंग पटेकर (सातवी), ऋतुजा राधाकिसन धोत्रे (सहावी), परवेज मुसा शेख (सातवी), महेश भानुदास शिंदे (सातवी), साईराम दिलीप शिंदे (सहावी), आदित्य बाबू आगळे (सहावी), आरती वैजनाथ शिंदे (सातवी) यांच्या कविता आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनAurangabadऔरंगाबादSchoolशाळा