शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

कोरोना काळात बालविवाह वाढले, मात्र उरकलेल्या बालविवाहांची माहिती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:04 IST

--- ग्रामस्तरावरून तक्रारीही येईनात : लपूनछपून झालेल्या बालविवाहांचे पुढे काय ? ---- औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या काळात ५५ बालविवाह रोखले ...

---

ग्रामस्तरावरून तक्रारीही येईनात : लपूनछपून झालेल्या बालविवाहांचे पुढे काय ?

----

औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या काळात ५५ बालविवाह रोखले गेले. मात्र, त्यापेक्षाही अधिक बालविवाह उरकल्याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. बालविवाह रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक गावात आहे. ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ म्हणून ग्रामसेवक कार्यरत असताना बालविवाह झाल्याची अधिकृत माहिती शासकीय यंत्रणेकडे येत नाही. जनजागृतीचा अभाव आणि आर्थिक, सामाजिक प्रश्न बिकट होत असल्याने शाळकरी मुलींच्या गळ्यातही मंगळसूत्र सहज दिसते आहे.

जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय बालसंरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा आणि गावस्तरावर समित्या आहेत. लाॅकडाऊन काळात बालविवाहांचे प्रमाण वाढल्याचे अधिकारी खासगीत मान्य करतात. मात्र, तक्रार नाही, गुन्हा नोंद नाही. त्यामुळे बालविवाह घडून गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. गाव पातळीवरून बालसंरक्षण समित्यांकडून माहिती मिळत नाही. तक्रार आली तर कारवाई करू, अशी हतबलता अधिकारी व्यक्त करत आहेत. गावात बालविवाह घडत असताना माहिती का येत नाही? जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या, त्यातील घटलेली पटसंख्येची कारणे शोधल्यास या घटना समोर येतील, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

------

सुरू झालेल्या शाळेतील एकूण विद्यार्थी - ६४,२२९

उपस्थित विद्यार्थी - १८,५०९

किती शाळा सुरू - ४८८

किती अद्याप बंद - १७१

---

शाळकरी मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र

---

-लाॅकडाऊननंतर काही गावांत शाळा सुरू झाल्या. गंगापूर तालुक्यात काही गावांतील उघडलेल्या शाळांत मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून आले. मात्र, अद्यापही त्याबद्दल तक्रारी गावातून आलेल्या नाहीत.

-आठवी ते दहावीच्या काळात गावांत लग्न होतात. नावापुरते प्रवेश घेऊन थेट परीक्षेला विद्यार्थिनी येतात. ही वस्तुस्थिती असताना शाळा स्तरावरून अद्याप कोणतीही माहिती महिला बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईनपर्यंत आलेली नाही.

--

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे ?

---

आठवीपर्यंत सरसकट पास केल्याने शाळाबाह्य झालेली मुलेही पटावर दिसतात. मात्र, नववी आणि दहावीत परीक्षा अर्ज भरताना अशा शाळाबाह्य झालेल्या मुला-मुलींचा आकडा समोर येतो. दरवर्षी किती मुलींची संख्या घटली त्याची कारणमीमांसा व्हायला हवी. तसेच मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह होऊ नये याची शाळा स्तरावर जनजागृती गरजेची आहे.

----

जबाबदारीचे ओझे, आर्थिक विवंचनेचे कारण

---

-गेल्या दीड वर्षांत कंपनीतील कामगार ते वेटबिगारी या सर्वांवरच आर्थिक संकट ओढावले.

-मुलींच्या शिक्षणापेक्षा जबाबदारीला, शिक्षणापेक्षा लग्नाला जास्त महत्त्व दिले जात असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने होणाऱ्या विवाहांबद्दल बालविवाह प्रतिबंधाची यंत्रणा हतबलता व्यक्त करते.

-गावस्तरावर लोक छुप्या विवाहांना मूकसंमती देतात, तक्रारी होत नाही.

-बालविवाह होण्याचे प्रमाण कोरोना काळात वाढल्याचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्तेही खासगीत मान्य करतात.

-----

चोरून, लपून बालविवाह झाले याचे अधिकृत रेकाॅर्ड उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षभरात ५५ बालविवाह रोखले. दोन ते तीन गुन्हेही दाखल केले. नुकताच बिडकिनचा बालविवाह रोखला. चाईल्ड लाईन १०९८, बालसंरक्षण समित्या माहिती मिळाल्यावर बालविवाह रोखतात. शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र देऊन शाळास्तरावर माहिती मिळाल्यास कळविण्याबद्दल पत्र देणार आहोत. जे बालविवाह झाले, त्याची कुणी तक्रार दिली तर त्याबद्दल प्रत्येक गावाचा बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवकांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.

-गणेश पुंगळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी

----

गावागावांत बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवक आहेत. बालकल्याण समित्या आहेत. मात्र, कोणीही कुणाच्या विरोधात जायला तयार नाही. त्याला जाती, धर्माच्या चढउताराचे कंगोरेही आहेत. त्यामुळे बालविवाहांच्या तक्रारी येत नाहीत. कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. छुप्या पद्धतीने हे विवाह होतात. लाॅकडाऊनमुळे गेलेले हातचे काम, मुलींचे शिक्षण आणि जबाबदारीत लग्नाला पालकांकडून पसंती दिली जाते.

-रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, विकास अध्ययन केंद्र

----