शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
4
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
5
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
6
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
7
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
8
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
9
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
10
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
11
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
12
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
13
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
14
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
15
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
16
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
17
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
18
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
19
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
20
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगराला १५ अग्निशमन उपकेंद्रांची गरज, सध्या ५ सुरू !

By मुजीब देवणीकर | Updated: May 6, 2025 11:33 IST

दहा वर्षांत दोन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाला यश

छत्रपती संभाजीनगर : शहराचा विस्तार झपाट्याने चारही दिशेने होतोय. लोकसंख्या वाढू लागली आहे. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या जशास तशी आहे. सध्या शहराला किमान १५ उपकेंद्रांची गरज भासत असताना पाच केंद्रांवर काम सुरू आहे. १० वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने शहरात पाच नवीन उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील दोनच केंद्र सुरू झाले. उर्वरित तीन कागदावरच आहेत. मागील काही दिवसांत मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग लागली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वेळेवर अग्निशमन बंब पोहोचले असते तर नुकसान कमी झाली असते.

शहरात मागील वर्षी छावणी येथे एका दुकानाला आणि पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अग्निशमन विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अलीकडेच शहागंज, गुलमंडी, राजा बाजार या भागांमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला होता. या विलंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दोन ते अडीच किमी अंतरात अग्निशमन उपकेंद्र असावेत असे निकष आहेत. दहा वर्षांपूर्वी मनपाने शहरात पाच उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल, कांचनवाडी, टी.व्ही. सेंटर, एन-९, पडेगाव येथेही उपकेंद्र उभारणीची घोषणा केली होती. एन-९, कांचनवाडी येथील केंद्राचे काम पूर्ण झाले. हे उपकेंद्र वापरातही आहेत.

शहागंजचा आराखडा तयार होतामहापालिकेच्या अग्निशमन विभागाने २०२१ मध्ये खास व्यापाऱ्यांसाठी शहागंज परिसरातील जलकुंभाजवळ उपलब्ध मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा तयार केला होता. अग्निशमन दलासाठी दोन गाड्या व आवश्यक मनुष्यबळासह लघु केंद्र उभारण्याची तयारी होती. परंतु, निधीअभावी, जागेच्या मालकीविषयक अडचणी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुढील पाऊलच उचलले गेले नाही.

कंत्राटी फायरमनची संख्या अधिकअग्निशमन विभागात सध्या १५० कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ५०, तर कंत्राटी पद्धतीवर १०० जणांची नेमणूक केली आहे. किमान ३०० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे.

पाच उपकेंद्र सुरूसध्या शहरात कुठेही आग लागली तर जवळच्या उपकेंद्रातून बंब पाठविण्यात येतात. यात पदमपुरा, सेव्हन हिल, चिकलठाणा, कांचनवाडी, एन-९ येथील केंद्रांचा समावेश आहे.

दोन महिन्यांतील आगीच्या प्रमुख घटना-५ मार्चला नारेगाव येथील सहा गोदाम आगीत भस्मसात झाली.- २० मार्चला आझाद चौकातील फर्निचरची अनेक दुकाने आगीत भस्मसात.- ८ एप्रिलला देवगिरी किल्ल्याला आग, पर्यटक, नागरिकांमध्ये खळबळ.-१० एप्रिलला ग्रँड सरोवर हॉटेलला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान.- १ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील सनराईज इंटरप्राईजेस कंपनी खाक.

केंद्र उभारणीचे प्रयत्नमहापालिकेच्या निधीतून हळूहळू उपकेंद्र उभारणे सुरू आहे. पडेगाव, शहागंज, हर्सूल, आदी भागात केंद्र सुरू होतील. नवीन विकास आराखड्यात अनेक ठिकाणी आरक्षणे आहेत. भविष्यात जागा प्राप्त होताच अनेक उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील.- संपत भगत, अग्निशमन प्रमुख, मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFire Brigadeअग्निशमन दल