शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

छत्रपती संभाजीनगराला १५ अग्निशमन उपकेंद्रांची गरज, सध्या ५ सुरू !

By मुजीब देवणीकर | Updated: May 6, 2025 11:33 IST

दहा वर्षांत दोन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाला यश

छत्रपती संभाजीनगर : शहराचा विस्तार झपाट्याने चारही दिशेने होतोय. लोकसंख्या वाढू लागली आहे. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या जशास तशी आहे. सध्या शहराला किमान १५ उपकेंद्रांची गरज भासत असताना पाच केंद्रांवर काम सुरू आहे. १० वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने शहरात पाच नवीन उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील दोनच केंद्र सुरू झाले. उर्वरित तीन कागदावरच आहेत. मागील काही दिवसांत मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग लागली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वेळेवर अग्निशमन बंब पोहोचले असते तर नुकसान कमी झाली असते.

शहरात मागील वर्षी छावणी येथे एका दुकानाला आणि पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अग्निशमन विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अलीकडेच शहागंज, गुलमंडी, राजा बाजार या भागांमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला होता. या विलंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दोन ते अडीच किमी अंतरात अग्निशमन उपकेंद्र असावेत असे निकष आहेत. दहा वर्षांपूर्वी मनपाने शहरात पाच उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल, कांचनवाडी, टी.व्ही. सेंटर, एन-९, पडेगाव येथेही उपकेंद्र उभारणीची घोषणा केली होती. एन-९, कांचनवाडी येथील केंद्राचे काम पूर्ण झाले. हे उपकेंद्र वापरातही आहेत.

शहागंजचा आराखडा तयार होतामहापालिकेच्या अग्निशमन विभागाने २०२१ मध्ये खास व्यापाऱ्यांसाठी शहागंज परिसरातील जलकुंभाजवळ उपलब्ध मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा तयार केला होता. अग्निशमन दलासाठी दोन गाड्या व आवश्यक मनुष्यबळासह लघु केंद्र उभारण्याची तयारी होती. परंतु, निधीअभावी, जागेच्या मालकीविषयक अडचणी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुढील पाऊलच उचलले गेले नाही.

कंत्राटी फायरमनची संख्या अधिकअग्निशमन विभागात सध्या १५० कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ५०, तर कंत्राटी पद्धतीवर १०० जणांची नेमणूक केली आहे. किमान ३०० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे.

पाच उपकेंद्र सुरूसध्या शहरात कुठेही आग लागली तर जवळच्या उपकेंद्रातून बंब पाठविण्यात येतात. यात पदमपुरा, सेव्हन हिल, चिकलठाणा, कांचनवाडी, एन-९ येथील केंद्रांचा समावेश आहे.

दोन महिन्यांतील आगीच्या प्रमुख घटना-५ मार्चला नारेगाव येथील सहा गोदाम आगीत भस्मसात झाली.- २० मार्चला आझाद चौकातील फर्निचरची अनेक दुकाने आगीत भस्मसात.- ८ एप्रिलला देवगिरी किल्ल्याला आग, पर्यटक, नागरिकांमध्ये खळबळ.-१० एप्रिलला ग्रँड सरोवर हॉटेलला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान.- १ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील सनराईज इंटरप्राईजेस कंपनी खाक.

केंद्र उभारणीचे प्रयत्नमहापालिकेच्या निधीतून हळूहळू उपकेंद्र उभारणे सुरू आहे. पडेगाव, शहागंज, हर्सूल, आदी भागात केंद्र सुरू होतील. नवीन विकास आराखड्यात अनेक ठिकाणी आरक्षणे आहेत. भविष्यात जागा प्राप्त होताच अनेक उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील.- संपत भगत, अग्निशमन प्रमुख, मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFire Brigadeअग्निशमन दल