शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

छत्रपती संभाजीनगराला १५ अग्निशमन उपकेंद्रांची गरज, सध्या ५ सुरू !

By मुजीब देवणीकर | Updated: May 6, 2025 11:33 IST

दहा वर्षांत दोन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाला यश

छत्रपती संभाजीनगर : शहराचा विस्तार झपाट्याने चारही दिशेने होतोय. लोकसंख्या वाढू लागली आहे. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या जशास तशी आहे. सध्या शहराला किमान १५ उपकेंद्रांची गरज भासत असताना पाच केंद्रांवर काम सुरू आहे. १० वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने शहरात पाच नवीन उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील दोनच केंद्र सुरू झाले. उर्वरित तीन कागदावरच आहेत. मागील काही दिवसांत मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग लागली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वेळेवर अग्निशमन बंब पोहोचले असते तर नुकसान कमी झाली असते.

शहरात मागील वर्षी छावणी येथे एका दुकानाला आणि पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अग्निशमन विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अलीकडेच शहागंज, गुलमंडी, राजा बाजार या भागांमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला होता. या विलंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दोन ते अडीच किमी अंतरात अग्निशमन उपकेंद्र असावेत असे निकष आहेत. दहा वर्षांपूर्वी मनपाने शहरात पाच उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल, कांचनवाडी, टी.व्ही. सेंटर, एन-९, पडेगाव येथेही उपकेंद्र उभारणीची घोषणा केली होती. एन-९, कांचनवाडी येथील केंद्राचे काम पूर्ण झाले. हे उपकेंद्र वापरातही आहेत.

शहागंजचा आराखडा तयार होतामहापालिकेच्या अग्निशमन विभागाने २०२१ मध्ये खास व्यापाऱ्यांसाठी शहागंज परिसरातील जलकुंभाजवळ उपलब्ध मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा तयार केला होता. अग्निशमन दलासाठी दोन गाड्या व आवश्यक मनुष्यबळासह लघु केंद्र उभारण्याची तयारी होती. परंतु, निधीअभावी, जागेच्या मालकीविषयक अडचणी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुढील पाऊलच उचलले गेले नाही.

कंत्राटी फायरमनची संख्या अधिकअग्निशमन विभागात सध्या १५० कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ५०, तर कंत्राटी पद्धतीवर १०० जणांची नेमणूक केली आहे. किमान ३०० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे.

पाच उपकेंद्र सुरूसध्या शहरात कुठेही आग लागली तर जवळच्या उपकेंद्रातून बंब पाठविण्यात येतात. यात पदमपुरा, सेव्हन हिल, चिकलठाणा, कांचनवाडी, एन-९ येथील केंद्रांचा समावेश आहे.

दोन महिन्यांतील आगीच्या प्रमुख घटना-५ मार्चला नारेगाव येथील सहा गोदाम आगीत भस्मसात झाली.- २० मार्चला आझाद चौकातील फर्निचरची अनेक दुकाने आगीत भस्मसात.- ८ एप्रिलला देवगिरी किल्ल्याला आग, पर्यटक, नागरिकांमध्ये खळबळ.-१० एप्रिलला ग्रँड सरोवर हॉटेलला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान.- १ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील सनराईज इंटरप्राईजेस कंपनी खाक.

केंद्र उभारणीचे प्रयत्नमहापालिकेच्या निधीतून हळूहळू उपकेंद्र उभारणे सुरू आहे. पडेगाव, शहागंज, हर्सूल, आदी भागात केंद्र सुरू होतील. नवीन विकास आराखड्यात अनेक ठिकाणी आरक्षणे आहेत. भविष्यात जागा प्राप्त होताच अनेक उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील.- संपत भगत, अग्निशमन प्रमुख, मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFire Brigadeअग्निशमन दल