शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘कार्बन क्रेडिट’ मिळविण्यासाठी मनपाची धडपड; कोट्यवधी रुपये मिळणार 

By मुजीब देवणीकर | Updated: June 29, 2023 15:56 IST

महापालिकेकडून इको निवारण ही त्रयस्थ संस्था नियुक्त करण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : महापालिका, स्मार्ट सिटी काही वर्षांपासून अनेक कल्याणकारी प्रकल्प राबवित आहेत. या प्रकल्पांमुळे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन थांबविण्यात यश मिळाले. दरवर्षी किती कार्बन उत्सर्जन थांबविले, याचे मोजमाप करण्यासाठी बुधवारी इको निवारण ही त्रयस्थ संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत किती कोटींचे कार्बन उत्सर्जन मनपाने थांबविले, याचा अहवाल ही संस्था देईल. त्यावरून आंतरराष्ट्रीय बाजारातून मनपाला प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल.

जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट बाजार चांगलाच बहरला आहे. देशातील काही प्रमुख शहरांनी कार्बन क्रेडिट मिळविणे सुरू केले. आपली महापालिका आणि स्मार्ट सिटी दीड वर्षांपासून यावर काम करीत आहेत. बुधवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी इको निवारण संस्थेसोबत बैठक घेतली. कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी मनपाने कोणते प्रकल्प राबविले, त्यातून किती कार्बन उत्सर्जन रोखले, याचा प्राथमिक आढावा घेतला. वृक्षारोपण, एलईडी पथदिवे, सौर उर्जा, पाणीपुरवठ्याचे पंप, वायू प्रदूषण रोखणे, घनकचरा व्यवस्थापन, ग्रीन बिल्डिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, दूषित पाण्यावर प्रकिया इ. प्रकल्पांचा यात समावेश होतो. इको निवारण संस्थेसोबत मनपा, स्मार्ट सिटी करार करणार आहेत. ही संस्था कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून देईल. आंतरराष्ट्रीय संस्था ‘यूएनएफसीसीसी’ यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. प्रमाणपत्रात जेवढे कार्बन उत्सर्जन रोखले, त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात ते क्रेडिट विकून पैसे मिळविता येतात.

कसे मोजतात कार्बन क्रेडिट?सौर ऊर्जा प्रकल्प असेल तर त्यातून तयार होणारी वीज किती, ही वीज तयार करण्यासाठी किती कोळशाचा वापर झाला असता, कार्बन किती युनिट रोखले, याचा अंदाज काढला जातो. तसेच मनपाने सिद्धार्थ उद्यानात १२०० झाडे लावली. ही झाडे कार्बन शोषणही करतात. वर्षभरातून किती कार्बन शोषण केले, त्यातून एक अंदाज काढला तर किमान ९ लाखांचे कार्बन क्रेडिट तयार होते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाenvironmentपर्यावरण