शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात...", चंद्रकांत खैरेंचे वादग्रस्त वक्तव्य

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2024 16:49 IST

शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. रविवारी(दि.01) राज्यभर 'जोडे मोरो' आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, असे अशी मुक्ताफळे उधळल्याने खळबळ उडाली आहे. 

मालवण येथील पुतळा पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार ) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरकारविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत आहेत. दरम्यान, आज मविआने राज्यात राज्य सरकारला जोडे मारो आंदाेलन छेडले होते. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले.

खैरे नेमकं काय म्हणाले?याच पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली. एवढेच नव्हे तर राज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली तर दंगली होतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरही दंगली का होत नाही? दंगली झाल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारविरोधात आंदोलन

रविवारी शहरातील क्रांती चौकात सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या मुख्यमंत्रीआणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची छायाचित्र असलेली बॅनर पोलिसांनी आंदोलकांशी झटापट करून हिसकावून घेतले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून क्रांतीचौक परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना