शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकीची धडक; दोघे ठार

By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST

येरमाळा : भरधाव वेगातील कार -दुचाकीची भीषण धडक होवून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमीस बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़

येरमाळा : भरधाव वेगातील कार -दुचाकीची भीषण धडक होवून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमीस बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-२१), विष्णू माळी (वय-२०) व बबन कडवकर (वय-२८) हे रविवारी सायंकाळी तिघे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३- एक्स़७३७६) जात होते़ त्यावेळी औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेल्या कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०९) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील विष्णू माळी, सुरज आगलावे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला असून, त्यास बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले होते़ तर अपघातानंतर कारचालकासह इतर इसमांनी घटनास्थळावरून धूम ठोकली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)अपघाताची माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे फौजदार डी़जी़अहंकारी, पोहेका जगताप यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तर तेरखेडा येथील श्रीराम घुले, रणजित घुले, अप्पा वाघमारे, जिकर मुजावर, अनिल सरवदे, गणेश मिरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून अपघातग्रस्तांना मदत केली़ घटनेनंतर अपघातस्थळी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती़ या घटनेत गावातीलच दोन युवक ठार झाल्याने व एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती़ जखमींना रूग्णालयात पाठविण्यासाठी पोलिसांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेत प्रयत्न केले़ त्यानंतर मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यासाठीही उपस्थित नागरिकांनीच पुढाकार घेतला होता़