शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती बायोगॅस बांधा; २२ हजारांपर्यंत अनुदान मिळवा

By बापू सोळुंके | Updated: August 29, 2024 19:41 IST

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारकडून घरगुती बायोगॅस उभारण्यासाठी जवळपास २२ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सुमारे २४० जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकाचा गॅस, तर मिळतोच शिवाय विविध पिकांना उपयुक्त असे सेंद्रिय खतही उपलब्ध होते. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?बायोगॅस तयार करण्यासाठी शेणखत, काडी, कचरा टाकला जातो. हा कचरा आणि शेणखत, बायोगॅसमध्ये कुजते आणि यातून गॅसची निर्मिती होती. काही दिवसांनंतर कुजलेल्या स्लरीचे रूपांतर उत्तम अशा सेंद्रिय खतामध्ये होते. हे सेंद्रिय खत विविध पिकांना उपयुक्त असते.

अर्ज कसा करणार ? बायोगॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात शेतकरी, शेतमजूर अर्ज करू शकतात. बायोगॅस बांधून झाल्यानंतर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना कळवूून तपासणी करून घ्यावी.

१४ ते २२ हजारांचे अनुदान (बॉक्स)नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस बांधण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांस १४ हजार ३५० रुपये केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते, तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना २२ हजार रुपये अनुदान देण्यात येते. शिवाय या बायोगॅसला शौचालयाची जोडणी करण्यासाठी अतिरिक्त १६०० रुपये मिळते आणि जिल्हा परिषद उपकरातून प्रत्येकी दहा हजार रुपये छत्रपती संभाजीनगर जि.प. देते.

जिल्ह्याला १५० बायोगॅसचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सन २०२४-२५ वर्षासाठी १५० बायोगॅस उभारणीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील ९ पंचायत समिती कार्यालयांना हे उद्दिष्ट वाटून देण्यात आले आहे.

दोन वर्षांत २४० जणांना लाभछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांनी मागील दोन वर्षांत तब्बल २४० जणांनी बायोगॅस बांधला आहे. पारंपरिक इंधनाला बायोगॅस उत्तम पर्याय म्हणून या लाभार्थ्यांना मिळाला आहे.

अर्ज करावेतनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेतकरी, शेतमजूर यांना बायोगॅस उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासोबत जि. प. उपकरातून १० हजार रुपये अनुदान दिले जाते. शेतकरी आणि शेतमजूर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करावे.- प्रकाश पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण