शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

घरगुती बायोगॅस बांधा; २२ हजारांपर्यंत अनुदान मिळवा

By बापू सोळुंके | Updated: August 29, 2024 19:41 IST

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारकडून घरगुती बायोगॅस उभारण्यासाठी जवळपास २२ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सुमारे २४० जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकाचा गॅस, तर मिळतोच शिवाय विविध पिकांना उपयुक्त असे सेंद्रिय खतही उपलब्ध होते. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना ?बायोगॅस तयार करण्यासाठी शेणखत, काडी, कचरा टाकला जातो. हा कचरा आणि शेणखत, बायोगॅसमध्ये कुजते आणि यातून गॅसची निर्मिती होती. काही दिवसांनंतर कुजलेल्या स्लरीचे रूपांतर उत्तम अशा सेंद्रिय खतामध्ये होते. हे सेंद्रिय खत विविध पिकांना उपयुक्त असते.

अर्ज कसा करणार ? बायोगॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात शेतकरी, शेतमजूर अर्ज करू शकतात. बायोगॅस बांधून झाल्यानंतर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना कळवूून तपासणी करून घ्यावी.

१४ ते २२ हजारांचे अनुदान (बॉक्स)नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस बांधण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांस १४ हजार ३५० रुपये केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते, तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना २२ हजार रुपये अनुदान देण्यात येते. शिवाय या बायोगॅसला शौचालयाची जोडणी करण्यासाठी अतिरिक्त १६०० रुपये मिळते आणि जिल्हा परिषद उपकरातून प्रत्येकी दहा हजार रुपये छत्रपती संभाजीनगर जि.प. देते.

जिल्ह्याला १५० बायोगॅसचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सन २०२४-२५ वर्षासाठी १५० बायोगॅस उभारणीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील ९ पंचायत समिती कार्यालयांना हे उद्दिष्ट वाटून देण्यात आले आहे.

दोन वर्षांत २४० जणांना लाभछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांनी मागील दोन वर्षांत तब्बल २४० जणांनी बायोगॅस बांधला आहे. पारंपरिक इंधनाला बायोगॅस उत्तम पर्याय म्हणून या लाभार्थ्यांना मिळाला आहे.

अर्ज करावेतनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेतकरी, शेतमजूर यांना बायोगॅस उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासोबत जि. प. उपकरातून १० हजार रुपये अनुदान दिले जाते. शेतकरी आणि शेतमजूर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करावे.- प्रकाश पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण