शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

औरंगाबाद महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:34 IST

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ...

ठळक मुद्देआयुक्त खरे बोलले : महापौर म्हणतात, ‘अनवधानाने बोलले असतील...’

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी केले. या विधानावरून एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी महापौरांनी दलालीच्या मुद्यावर सारवासारव करीत अनवधानाने आयुक्त बोलले असतील असे नमूद केले. ‘लोकमत’ने दलालीच्या मुद्यावर काही विभागांमध्ये चाचपणी केली असता आयुक्त १०० टक्के खरे बोलल्याचे दिसून आले. महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलालांशिवाय पानही हलत नाही, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.नगररचना विभागबांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, गुंठेवारी आदी कामांसाठी सर्वसामान्य नागरिक अक्षरश: उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांची कामे होत नाहीत. कारण त्यांनी दलालांमार्फत फाईल दाखल केलेली नसते. थेट फाईल दाखल केली असल्यास नंतर दलालांची मदत घेतलेली नसते. ज्यांना या विभागाची परंपरा माहीत आहे, त्या बांधकाम व्यावसायिकांची फाईल अजिबात कुठेच थांबत नाही. सध्या या विभागात ८०० फायलींचा डोंगर साचला आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती फायली प्रलंबित आहेत याचा हिशेबच नाही. ज्या मालमत्ताधारकांनी दलालांमार्फत ‘इच्छा’तीच फाईल बाहेर निघते. एखाद्याने खूपच राग, रोष व्यक्त केल्यास त्याच्या फाईलमध्ये एवढ्या त्रुटी काढण्यात येतात की, आयुष्यभर तो त्रुटींची पूर्तता करू शकत नाही.अतिक्रमण विभागया विभागात बोटावर मोजण्याऐवढेच चमत्कारिक अधिकारी व कर्मचारी आहेत. या विभागात दरवर्षी सुमारे १५०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील फक्त ५० ठिकाणीच कारवाई होते. कारवाई करण्यासाठी यांची ‘मर्जी’ सांभाळावी लागते. ज्या व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कारवाई होणार आहे, त्याला जास्त नुकसान होऊ देणार नाही म्हणून ही मंडळी अलगदपणे आपला वाटा काढून घेतात. या सर्व व्यवहारासाठी दलालांची भूमिका सर्वात मोठी ठरते. माहिती अधिकारात माहिती मिळवून तक्रार देण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी वॉर्डनिहाय दलाल नेमून ठेवले आहेत. दिवसभरात एवढी ‘माया’ आपण सोबत नेली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व जण काम करतात.मालमत्ता विभागमहापालिकेसाठी सोन्याची अंडी देणारा हा विभाग होय. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या विभागातही प्रचंड दलाली वाढली आहे. महापालिकेच्या जागा परस्पर ३० वर्षांसाठी भाडेकरारावर देणे, महापालिकेच्या दुकानांमधील भाडेकरूंकडून वसुली करणे, पण मनपात जमा न करणे, होर्डिंग व्यवसायात मनपाच्या तिजोरीत कमी आणि आपल्या खिशात जास्त महसूल कसा जाईल यादृष्टीने सर्वदूर प्रयत्न सुरू असतात. पार्किंग, बाजार आदी ठिकाणी वसुलीसाठी दलालच नेमून ठेवले आहेत.वॉर्ड कार्यालयेशहरात महापालिकेचे नऊ वॉर्ड कार्यालये आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कामाच्या स्वरुपानुसार दलाल मंडळी नेमलेले आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून नवीन कर लावून देणे, जुनी थकबाकी असेल तर त्यात मार्ग काढून देणे, अनधिकृत नळ, साफसफाई आदी प्रत्येक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. दलालांशिवाय येथेही पान हलत नाही. वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंत्यांना ही बाब माहीत नाही, असे नाही. उलट या मंडळींमुळेच अधिकारी व कर्मचाºयांचा खडतर ‘मार्ग’ अधिक सोपा होतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण