शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

औरंगाबाद महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:34 IST

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ...

ठळक मुद्देआयुक्त खरे बोलले : महापौर म्हणतात, ‘अनवधानाने बोलले असतील...’

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी केले. या विधानावरून एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी महापौरांनी दलालीच्या मुद्यावर सारवासारव करीत अनवधानाने आयुक्त बोलले असतील असे नमूद केले. ‘लोकमत’ने दलालीच्या मुद्यावर काही विभागांमध्ये चाचपणी केली असता आयुक्त १०० टक्के खरे बोलल्याचे दिसून आले. महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलालांशिवाय पानही हलत नाही, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.नगररचना विभागबांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, गुंठेवारी आदी कामांसाठी सर्वसामान्य नागरिक अक्षरश: उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांची कामे होत नाहीत. कारण त्यांनी दलालांमार्फत फाईल दाखल केलेली नसते. थेट फाईल दाखल केली असल्यास नंतर दलालांची मदत घेतलेली नसते. ज्यांना या विभागाची परंपरा माहीत आहे, त्या बांधकाम व्यावसायिकांची फाईल अजिबात कुठेच थांबत नाही. सध्या या विभागात ८०० फायलींचा डोंगर साचला आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती फायली प्रलंबित आहेत याचा हिशेबच नाही. ज्या मालमत्ताधारकांनी दलालांमार्फत ‘इच्छा’तीच फाईल बाहेर निघते. एखाद्याने खूपच राग, रोष व्यक्त केल्यास त्याच्या फाईलमध्ये एवढ्या त्रुटी काढण्यात येतात की, आयुष्यभर तो त्रुटींची पूर्तता करू शकत नाही.अतिक्रमण विभागया विभागात बोटावर मोजण्याऐवढेच चमत्कारिक अधिकारी व कर्मचारी आहेत. या विभागात दरवर्षी सुमारे १५०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील फक्त ५० ठिकाणीच कारवाई होते. कारवाई करण्यासाठी यांची ‘मर्जी’ सांभाळावी लागते. ज्या व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कारवाई होणार आहे, त्याला जास्त नुकसान होऊ देणार नाही म्हणून ही मंडळी अलगदपणे आपला वाटा काढून घेतात. या सर्व व्यवहारासाठी दलालांची भूमिका सर्वात मोठी ठरते. माहिती अधिकारात माहिती मिळवून तक्रार देण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी वॉर्डनिहाय दलाल नेमून ठेवले आहेत. दिवसभरात एवढी ‘माया’ आपण सोबत नेली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व जण काम करतात.मालमत्ता विभागमहापालिकेसाठी सोन्याची अंडी देणारा हा विभाग होय. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या विभागातही प्रचंड दलाली वाढली आहे. महापालिकेच्या जागा परस्पर ३० वर्षांसाठी भाडेकरारावर देणे, महापालिकेच्या दुकानांमधील भाडेकरूंकडून वसुली करणे, पण मनपात जमा न करणे, होर्डिंग व्यवसायात मनपाच्या तिजोरीत कमी आणि आपल्या खिशात जास्त महसूल कसा जाईल यादृष्टीने सर्वदूर प्रयत्न सुरू असतात. पार्किंग, बाजार आदी ठिकाणी वसुलीसाठी दलालच नेमून ठेवले आहेत.वॉर्ड कार्यालयेशहरात महापालिकेचे नऊ वॉर्ड कार्यालये आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कामाच्या स्वरुपानुसार दलाल मंडळी नेमलेले आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून नवीन कर लावून देणे, जुनी थकबाकी असेल तर त्यात मार्ग काढून देणे, अनधिकृत नळ, साफसफाई आदी प्रत्येक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. दलालांशिवाय येथेही पान हलत नाही. वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंत्यांना ही बाब माहीत नाही, असे नाही. उलट या मंडळींमुळेच अधिकारी व कर्मचाºयांचा खडतर ‘मार्ग’ अधिक सोपा होतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण