शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

भाजपचे शासन सुशासन असून शेतकरी हिताचे निर्णय घेणारे ; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 14:49 IST

भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्‍याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

करमाड ( औरंगाबाद ) : भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्‍याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी ‘सुशासन युवा महोत्सव’ मेळावा फुलंब्री मतदारसंघातील करमाड येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. राहुल टिळेकर उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रथम भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा उपमहापौर विजय औताडे, औरंगाबाद तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, फुलंब्री तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुदाम गायकवाड, सुदाम ठोंबरे व करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच दत्तात्रय उकर्डे व सदस्यांनी चंद्रकांत पाटील व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा महोत्सव व युवा मेळाव्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यानुसार महाराष्ट्रातील १ लाख ६७ हजार शेतकर्‍यांचे दीड लाखांपर्यंतचे ३४ हजार २०० कोटी रुपये कर्ज माफ झाले. ही सर्व रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल. याबाबत शेतकर्‍यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा समाचार घेतला.

यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आ. नारायण कुचे, आ. अतुल सावे, नामदेवराव गाडेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, लक्षण औटी, सजनराव मते, राहुल चौधरी, रघुनाथ काळे, साहेबराव डिघुले, दामूअण्णा नवपुते, अशोक पवार, माजी महापौर भगवान घडामोडे, शिवाजी पाथ्रीकर, गणेश पाटील दहीहंडे, प्रकाश चांगुलपाये, अनुराधा चव्हाण, सभापती राधाकिसन पठाडे, अप्पासाहेब शेळके, गोपीनाथ वाघ यांच्यासह फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सूत्रसंचालन भाऊराव मुळे यांनी केले तर आभार उपसरपंच दत्तात्रय उकर्डे यांनी मानले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस