शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:42 IST

२० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे

औरंगाबाद : राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, चारवेळा शिवसेना-भाजपा युतीचा खासदार होतो. प्रत्येक वेळी युतीमध्ये लढलो. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दगा दिला. महाविकास आघाडीशी युती केली. अडीच वर्षांत १० वर्षे राज्य मागे गेले. पिण्याच्या पाण्याची योजनाही पूर्णत्वास नेली नाही. एमआयएमचा खासदार अपघाताने निवडून आला आहे. माजी व विद्यमान खासदाराने थापा मारण्याचे काम केले आहे. २० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे, असे आव्हान कराड यांनी दिले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपा लोकसभेत ३५० हून अधिक जागा जिंकेल.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कुणीच नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पाच आमदार जिल्ह्यात असताना त्यांना सभेसाठी निमंत्रित केले नव्हते. कारण ही पक्षाची स्वतंत्र सभा होती. परंतु लोकसभा निवडणूक बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणा करण्यात आली.

नड्डांच्या २० मिनिटांच्या भाषणात काय...राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २० मिनिटांचे भाषण केले. मोदी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या योजनांवर त्यांनी १२ मिनिटे भाषण केले. देशात कोणत्या योजनेचा लाभ कुणाला मिळाला, यावर चार मिनिटे, तर महाविकास आघाडी सरकारवर ४ मिनिटांचे टीकात्मक भाषण केले.

केणेकर व पोलिसांत वाद....प्रवेशावरून प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आणि पोलिस निरीक्षक पोटे यांच्यात वाद झाला. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटले.काळे कपडे घातलेल्यांना रोखले...सभेला काळे कपडे, जॅकेट घालून आलेल्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच राेखले. त्यामुळे अनेकजण बाहेरच थांबले.

नियोजनात स्थानिक कमी पडले? पाच दिवसांत सभेचे नियोजन करण्यात आले. नियोजनात स्थानिक नेते कमी पडले का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण गर्दी, शहर व ग्रामीण नेतृत्व, संवादाचा अभाव दिसून आल्याचे बाेलले जात आहे. सभेला उशीर व इतरांची लांबलेली भाषणे यामुळे नड्डा सभास्थळी येईपर्यंत अनेकांनी मैदान सोडले होते.

गर्दीला थांबविण्यासाठी नेते मैदानात---सभेसाठी आलेले नागरिक जाऊ नयेत, यासाठी व्यासपीठावरील काही पदाधिकारी गर्दीत जाऊन नागरिकांना थांबवून खुर्च्यांवर बसवीत होते, तर दुसरीकडे अनेक नेत्यांना भाषणाचीही संधी मिळाली नाही. सभेतील रिकाम्या खुर्च्यांमुळे सोशल मीडियातून विरोधकांनी सभेवर जोरदार मिश्कील टिप्पणी केली, तर सभेला उशीर झाल्यामुळे लोकं गेल्याचे स्पष्टीकरण भाजपाने दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाBhagwat Karadडॉ. भागवतj. p. naddaजे. पी. नड्डा