शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:34 IST

शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देशहरात शांतता महत्त्वाची : शिवसेनेचा मोर्चा तर, आमची मदतफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.खा. खैरे यांना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे शोभत नाही. शनिवारी रात्री दंगलसदृश स्थितीत तीन वेळा माझ्या फ ोनवरून ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि भाजपचे कुणीही घटनास्थळी नव्हते, असा आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना त्यांनी तातडीने शनिवारी शहरात पाठविले. या सगळ्या घडामोडी माहिती असताना खा.खैरे स्मरणशक्ती गेल्यासारखे मुख्यमंत्री व भाजपवर बेताल आरोप करीत असल्याचा हल्ला आ.अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत चढविला. शहर विकासावर बोलावे, दंगलसदृश स्थितीत कोण होते, नव्हते यावर कशाला बोलता, असा टोलाही त्यांनी खैरेंना लगावला.खैरेंनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, त्यांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. हिंदूंच्या रक्षणाचा ठेका त्यांनी एकट्यानेच घेतलेला नाही. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजपने केला.शिवसेना मोर्चा काढून राजकारण करीत आहे, त्यामुळे शहर आणखी दहा वर्षे मागे जाणार आहे. परंतु आम्ही दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा रोजगार, निवारा देण्यासाठी मदतफेरी काढणार असल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी अनिल मकरिये, एकनाथ जाधव, कचरू घोडके, चंद्रकांत हिवराळे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री आणि खैरे यांच्यात विसंवाद४पालकमंत्री डॉ.सावंत शांतता राखण्याचे आवाहन करतात. तसेच दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या बाजूने बोलतात. तिकडे खैरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवितात. पालकमंत्र्यांची भूमिका खैरेंना मान्य नाही, असे वाटते आहे.४वातावरण शांत करण्याऐवजी ते भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगलीमुळे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो.४दंगलीत दोन्ही बाजूंनी समाजकंटक कार्यरत होते. जे निर्दाेष असतील त्यांच्या बाजूने भाजप ठामपणे उभे राहील, असे बोराळकर म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा