शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:34 IST

शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देशहरात शांतता महत्त्वाची : शिवसेनेचा मोर्चा तर, आमची मदतफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.खा. खैरे यांना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे शोभत नाही. शनिवारी रात्री दंगलसदृश स्थितीत तीन वेळा माझ्या फ ोनवरून ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि भाजपचे कुणीही घटनास्थळी नव्हते, असा आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना त्यांनी तातडीने शनिवारी शहरात पाठविले. या सगळ्या घडामोडी माहिती असताना खा.खैरे स्मरणशक्ती गेल्यासारखे मुख्यमंत्री व भाजपवर बेताल आरोप करीत असल्याचा हल्ला आ.अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत चढविला. शहर विकासावर बोलावे, दंगलसदृश स्थितीत कोण होते, नव्हते यावर कशाला बोलता, असा टोलाही त्यांनी खैरेंना लगावला.खैरेंनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, त्यांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. हिंदूंच्या रक्षणाचा ठेका त्यांनी एकट्यानेच घेतलेला नाही. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजपने केला.शिवसेना मोर्चा काढून राजकारण करीत आहे, त्यामुळे शहर आणखी दहा वर्षे मागे जाणार आहे. परंतु आम्ही दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा रोजगार, निवारा देण्यासाठी मदतफेरी काढणार असल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी अनिल मकरिये, एकनाथ जाधव, कचरू घोडके, चंद्रकांत हिवराळे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री आणि खैरे यांच्यात विसंवाद४पालकमंत्री डॉ.सावंत शांतता राखण्याचे आवाहन करतात. तसेच दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या बाजूने बोलतात. तिकडे खैरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवितात. पालकमंत्र्यांची भूमिका खैरेंना मान्य नाही, असे वाटते आहे.४वातावरण शांत करण्याऐवजी ते भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगलीमुळे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो.४दंगलीत दोन्ही बाजूंनी समाजकंटक कार्यरत होते. जे निर्दाेष असतील त्यांच्या बाजूने भाजप ठामपणे उभे राहील, असे बोराळकर म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा