शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

अनुदानाअभावी लाभार्थ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:49 IST

तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे. निराधारांची अनुदानाची रक्कम आयसीआयसी बँकेच्या वतीने गावोगाव वाटप करते; पण लाभार्थ्यांना धरसोड पद्धतीने होणाºया वाटपाने लाभार्थी वंचित राहत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या दोन भगिनी गेल्या अकरा महिन्यांपासून वंचित आहेत.किनवट तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ९६१ श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९४५ व इंदिरा गांधी निराधार योजनेचे १ हजार ५५१ असे एकूण ५ हजार ४५७ लाभार्थी आहे. १९१ गांवे १०५ वाडी-तांड्यातील बहुतांश लाभार्थ्यांना त्यांचे ठरवून दिलेले अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेतच लाभार्थ्यांना राहावे लागत आहे. आयसीआयसी बँकेच्या सी.एस.पी. मार्फत गावोगाव लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे. मात्र बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतात नव्हे वेळेवर अनुदान मिळतच नसल्याने कोणाचाच आधार नसलेल्या निराधारांना अनुदान मंजूर असून मिळत नसल्याने उपासमारीचा सामना करावा लागत आहे.आईवडिलाचे छत्र हरवलेल्या व नातेवाईकांनी झिडकारलेल्या नेहा गणेश सिरपुले व निकिता गणेश सिरपुले या दोघी बहिणींचीही आता उपासमार होऊ लागली आहे. आजीकडे राहत मोलमजुरी करीत शिक्षण घेणाºया नेहाने वर्षभरापूर्वी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली होती. या पत्रानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी किनवटला भेट देऊन तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, तहसीलदार महमद अजीमोद्दीन यांच्या मदतीने निराधार मुलीचा शोध घेतला आणि तातडीने मदत करण्याचे सुचविले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेत या बहिणींचे नाव घेतले. तीन महिन्यांचे मानधन त्यांना मिळालेही मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने त्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत नायब तहसीलदार हराळे यांचा विचारले असता आॅक्टोबर २०१७ पासून नेहा व निकिताचे मानधनाचे पैसे पाठविले असून बँक खाते उघडण्याची अडचण आहे. किनवट येथे आयसीआयसी बँकेची शाखा नाही. वाटप मात्र सी.एस.पी. मार्फत होणारे निराधारांचे अनुदान वाटप लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर मिळत नाही. बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून मोठी समस्या उद्भवते. निराधारांचे अनुदान पूर्ववत स्थानिक बँकेमार्फतच करावे, अशी मागणी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी केली आहे.