शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी लाभार्थ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:49 IST

तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे. निराधारांची अनुदानाची रक्कम आयसीआयसी बँकेच्या वतीने गावोगाव वाटप करते; पण लाभार्थ्यांना धरसोड पद्धतीने होणाºया वाटपाने लाभार्थी वंचित राहत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या दोन भगिनी गेल्या अकरा महिन्यांपासून वंचित आहेत.किनवट तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ९६१ श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९४५ व इंदिरा गांधी निराधार योजनेचे १ हजार ५५१ असे एकूण ५ हजार ४५७ लाभार्थी आहे. १९१ गांवे १०५ वाडी-तांड्यातील बहुतांश लाभार्थ्यांना त्यांचे ठरवून दिलेले अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेतच लाभार्थ्यांना राहावे लागत आहे. आयसीआयसी बँकेच्या सी.एस.पी. मार्फत गावोगाव लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे. मात्र बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतात नव्हे वेळेवर अनुदान मिळतच नसल्याने कोणाचाच आधार नसलेल्या निराधारांना अनुदान मंजूर असून मिळत नसल्याने उपासमारीचा सामना करावा लागत आहे.आईवडिलाचे छत्र हरवलेल्या व नातेवाईकांनी झिडकारलेल्या नेहा गणेश सिरपुले व निकिता गणेश सिरपुले या दोघी बहिणींचीही आता उपासमार होऊ लागली आहे. आजीकडे राहत मोलमजुरी करीत शिक्षण घेणाºया नेहाने वर्षभरापूर्वी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली होती. या पत्रानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी किनवटला भेट देऊन तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, तहसीलदार महमद अजीमोद्दीन यांच्या मदतीने निराधार मुलीचा शोध घेतला आणि तातडीने मदत करण्याचे सुचविले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेत या बहिणींचे नाव घेतले. तीन महिन्यांचे मानधन त्यांना मिळालेही मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने त्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत नायब तहसीलदार हराळे यांचा विचारले असता आॅक्टोबर २०१७ पासून नेहा व निकिताचे मानधनाचे पैसे पाठविले असून बँक खाते उघडण्याची अडचण आहे. किनवट येथे आयसीआयसी बँकेची शाखा नाही. वाटप मात्र सी.एस.पी. मार्फत होणारे निराधारांचे अनुदान वाटप लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर मिळत नाही. बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून मोठी समस्या उद्भवते. निराधारांचे अनुदान पूर्ववत स्थानिक बँकेमार्फतच करावे, अशी मागणी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी केली आहे.