बँक कर्मचार्यांचा आवाज बुलंद
By Admin | Updated: May 24, 2014 02:07 IST2014-05-24T01:58:14+5:302014-05-24T02:07:20+5:30
औरंगाबाद : केंद्र सरकारने नेमलेल्या पी. जे. नायक समितीने ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करावे, बँकांतील सरकारची
बँक कर्मचार्यांचा आवाज बुलंद
औरंगाबाद : केंद्र सरकारने नेमलेल्या पी. जे. नायक समितीने ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करावे, बँकांतील सरकारची हिस्सेदारी ५० टक्क्यांपेक्षा कमी करावी व बँकांचे विलीनीकरण करावे, अशा शिफारशी केल्या आहेत. या विरोधात आज सर्व बँक कर्मचार्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने करून आपला आवाज बुलंद केला. सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या झोनल आॅफिससमोर सायंकाळी ६ वाजता बँकिंग क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी व कर्मचारी एकत्र आले होते. ‘बँकांचे विलीनीकरण गंधी सोच...गंधी सोच’, ‘नायक कमिटी रिकमंडेशन फेक दो फेक दो’ अशा जोरदार घोेषणा कर्मचार्यांनी दिल्या. यानंतर जगदीश भावठाणकर, देवीदास तुळजापूरकर, रवी धामणगावकर यांची भाषणे झाली. पी. जे. नायक समितीने सरकारला केलेल्या शिफारशीत बँकिंग उद्योगातील सुधारणांचा ऊहापोह केला. हा अहवाल कर्मचारी विरोधीच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे धोरणच बदलविणारा ठरणार आहे. याद्वारे खाजगीकरणाचा घाट घातला जात असून, बँकांमध्ये असलेला सरकारचा सहभाग एका कंपनीमार्फत विविध बँकांमध्ये गुंतविण्यात येणार आहे. याआधीही बँकांचे विलीनीकरण, खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता; पण तो डाव बँक कर्मचारी संघटनांनी हाणून पाडला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरोधी शिफारशीचाही आम्ही तेवढ्याच ताकदीने विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. निदर्शनात एआयबीईए, एआयबीओएल, बीईएफआय, आयएनबीईएफ व आयएनबीओसी या बँकिंग क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.