शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांना पाहिजे बदली

By admin | Updated: May 31, 2014 00:29 IST

विजय चोरडिया, जिंतूर जिंतुरातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकार्‍यांची जिंतुरात काम करण्याची मानसिकता नाही.

विजय चोरडिया,  जिंतूर जिंतुरातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकार्‍यांची जिंतुरात काम करण्याची मानसिकता नाही. बदली व्हावी, यासाठी अधिकारी मंत्रालयात वेगवेगळ्या राजकीय पक्ष व अधिकार्‍यांच्या लॉबीशी संपर्क साधून बदलीच्या तयारीत आहेत. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका हॉट तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये काम करण्यास अधिकार्‍यांची मानसिकता नसते. याचीच परिचिती पहावयास मिळत आहे. तालुक्यातील तहसीलदार मंजुषा लटपटे या मागील अनेक दिवसांपासून बदलीच्या तयारीत असल्याचे समजते. परंतु, लोकसभेची आचारसंहिता, पदवीधरची आचारसंहिता व आगामी विधानसभा निवडणूक पाहता त्यांची बदली होईल की नाही, याची शाश्वती नाही. असे असले तरी मागील २२ मे पासून लटपटे बदली व्हावी, यासाठी रजेवर आहेत. यामुळे जिंतूर तहसील कार्यालयातील विविध कामे खोळंबलेल्या अवस्थेत आहेत. आधीच महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत झालेला सावळा गोंधळ व त्यातच बदलीचा प्रयत्न यामुळे अनेक कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, शैक्षणिक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होताना दिसत आहे. रोजगार हमी योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक कामांबाबत योग्य त्या पद्धतीने हाताळणी न केल्याने सरपंच, ग्रामसेवक व कार्यकर्त्यांच्या असंख्य तक्रारी मनरेगाबाबत आहेत. तहसीलदारांप्रमाणेच मागील सहा महिन्यांपासून बदलीसाठी सतत प्रयत्न करणारे न.प.चे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव बदली व्हावी, यासाठी १९ मे पासून रजेवर आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक वेळा बदलीसाठी मंत्रालय गाठले होते. परंतु, त्यांची बदली होऊ शकली नाही. पालिकेमध्ये प्रभारी मुख्याधिकारी असल्याने नागरिकांना विविध कामाबाबत त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंते बेलेकर त्यांच्याकडेही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातही कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. गटशिक्षणाधिकारी प्रभारी असल्याने आठवड्यातील काही दिवसच मुख्यालयी हजेरी लावतात. अशीच परिस्थिती लघूसिंचन, पाटबंधारे व जिल्हा परिषद या कार्यालयांची आहे. कार्यालयामध्ये असणारे अधिकारी काम करण्यास फारसे उत्सूक नाहीत. आठवड्यातील एक किंवा दोन दिवसच मुख्यालयी येत असल्याने कार्यालयातील कामकाजही अलबेल होत असल्याचे दिसत आहे. शासकीय कार्यालयाप्रमाणेच महावितरण कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. उप विभागीय अभियंता, शाखा अभियंता व शहर अभियंता यांचा शोध घ्यावा लागतो. महिन्यातून दोन ते तीन वेळा कार्यालयात येत असल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वैतागलेल्या अवस्थेत आहेत. सर्व कार्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. जिंतूर पंचायत समितीअंतर्गत गटविकास अधिकारी म्हणून सुरवसे व सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून गोरे यांच्या नियुक्तीचे आदेश आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढले. परंतु, तब्बल आठ दिवसानंतरही हे अधिकारी रुजू झाले नाहीत. किंबहुना जिंतूर नको ही भूमिका या अधिकार्‍यांची आहे की काय, याबाबत उलटसुलट चर्चा असून राजकीय पक्षांना आपल्या सोयीचा अधिकारी हवा असतो. जिंतूरतालुक्यात मात्र राजकीय पक्षांच्या संमतीशिवाय अधिकार्‍यांना रुजू होता येत नाही. त्यामुळेच की काय हे नवीन अधिकारी जिंतुरात आले नसल्याची चर्चा आहे.जिंतूर तहसील कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. तहसीलदार यांचे नियंत्रण नसल्याने अनेक विभागातील कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. सुरुवातीला लोकसभेच्या आचारसंहितचे कारण, त्यानंतर तहसीलदारांची रजा व आता पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता यामुळे महसूल प्रशासनाचे चांगभले झाले आहेत. आचारसंहितेकडे बोट दाखवून नागरिकांच्या कामांची टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यात मनरेगाची कामे बंद आहेत. जुन्या कामांचे मस्टर व पेमेंट चुकीच्या पद्धतीने काढल्याने फार मोठी अनियमितता या कामात झाल्याचे दिसते.