शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

केंद्राच्या ‘अमृत’मधून औरंगाबादची पाणीपुरवठा योजना; एक हजार कोटींनी वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:27 IST

वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या ‘अमृत-२’मध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ६ ऑक्टोबर रोजी महापालिकेत केली. योजनेचा खर्च एक हजार ३४ कोटी रुपयांनी वाढला असून, आता या योजनेवर २ हजार ७१४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. केंद्र शासन ६७८ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. उर्वरित निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल. फेब्रुवारी २०२४पर्यंत योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. तसेच २४ तास पाणी देण्यासाठी केंद्राचे पथक येऊन आढावा घेईल, असेही डॉ. कराड यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत डॉ. कराड म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली; मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजनेचे काम संथगतीने सुरू होते. सत्ताबदल झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानुसार वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला. यावेळी मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, शहर अभियंता सखाराम पानझडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राम लोलापोट, कार्यकारी अभियंता अजयसिंग, महापालिकेचे एम. बी. काझी, किरण धांडे, बाविस्कर यांच्यासह ‘पीएमसी’चे समीर जोशी उपस्थित होते.

सात दिवसांत २४ तास पाणी पण...सध्याच्या पाणीपुरवठा योजनेत नळाला मीटर बसविण्याचा समावेश नसून आगामी काळात केंद्र शासनाचे पथक आढावा घेईल. सात दिवस २४ तास पाणी देण्यासाठी मीटर लावणे गरजेचे आहे. नळाला मीटर लावण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, केंद्राने देशातील ८० शहरांना २४ तास सात दिवस पाणी देण्यासाठी योजना जाहीर केली आहे. त्यात औरंगाबादच्या समावेशासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश एमजेपीला दिल्याचे कराड म्हणाले.

उद्भव विहिरीला लागणार दोन वर्षे---पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्र शासनाने दिल्या आहेत. जायकवाडी धरणातील ‘हेडवर्क’च्या कामाला किमान दोन वर्षे लागतील. उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी कमी झाल्यावर काम सुरू होईल. गरज पडल्यास जलसंपदा विभागाची बैठक घेऊ, असे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांनी सांगितले.

महापालिकेला भरावे लागणार ८१० कोटी‘अमृत-२’ योजनेत केंद्राचा २५ टक्के, राज्याचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार महापालिकेला ८१० कोटी रुपये भरावे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. त्यावर लवकरच राज्य, केंद्र व महापालिकेची बैठक घेऊ, असे आश्वासन कराड यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीBhagwat Karadडॉ. भागवत