शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

केंद्राच्या ‘अमृत’मधून औरंगाबादची पाणीपुरवठा योजना; एक हजार कोटींनी वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:27 IST

वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या ‘अमृत-२’मध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ६ ऑक्टोबर रोजी महापालिकेत केली. योजनेचा खर्च एक हजार ३४ कोटी रुपयांनी वाढला असून, आता या योजनेवर २ हजार ७१४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. केंद्र शासन ६७८ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. उर्वरित निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल. फेब्रुवारी २०२४पर्यंत योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. तसेच २४ तास पाणी देण्यासाठी केंद्राचे पथक येऊन आढावा घेईल, असेही डॉ. कराड यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत डॉ. कराड म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली; मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजनेचे काम संथगतीने सुरू होते. सत्ताबदल झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानुसार वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला. यावेळी मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, शहर अभियंता सखाराम पानझडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राम लोलापोट, कार्यकारी अभियंता अजयसिंग, महापालिकेचे एम. बी. काझी, किरण धांडे, बाविस्कर यांच्यासह ‘पीएमसी’चे समीर जोशी उपस्थित होते.

सात दिवसांत २४ तास पाणी पण...सध्याच्या पाणीपुरवठा योजनेत नळाला मीटर बसविण्याचा समावेश नसून आगामी काळात केंद्र शासनाचे पथक आढावा घेईल. सात दिवस २४ तास पाणी देण्यासाठी मीटर लावणे गरजेचे आहे. नळाला मीटर लावण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, केंद्राने देशातील ८० शहरांना २४ तास सात दिवस पाणी देण्यासाठी योजना जाहीर केली आहे. त्यात औरंगाबादच्या समावेशासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश एमजेपीला दिल्याचे कराड म्हणाले.

उद्भव विहिरीला लागणार दोन वर्षे---पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्र शासनाने दिल्या आहेत. जायकवाडी धरणातील ‘हेडवर्क’च्या कामाला किमान दोन वर्षे लागतील. उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी कमी झाल्यावर काम सुरू होईल. गरज पडल्यास जलसंपदा विभागाची बैठक घेऊ, असे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांनी सांगितले.

महापालिकेला भरावे लागणार ८१० कोटी‘अमृत-२’ योजनेत केंद्राचा २५ टक्के, राज्याचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार महापालिकेला ८१० कोटी रुपये भरावे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. त्यावर लवकरच राज्य, केंद्र व महापालिकेची बैठक घेऊ, असे आश्वासन कराड यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीBhagwat Karadडॉ. भागवत