शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

केंद्राच्या ‘अमृत’मधून औरंगाबादची पाणीपुरवठा योजना; एक हजार कोटींनी वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:27 IST

वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या ‘अमृत-२’मध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ६ ऑक्टोबर रोजी महापालिकेत केली. योजनेचा खर्च एक हजार ३४ कोटी रुपयांनी वाढला असून, आता या योजनेवर २ हजार ७१४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. केंद्र शासन ६७८ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. उर्वरित निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल. फेब्रुवारी २०२४पर्यंत योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. तसेच २४ तास पाणी देण्यासाठी केंद्राचे पथक येऊन आढावा घेईल, असेही डॉ. कराड यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत डॉ. कराड म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली; मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजनेचे काम संथगतीने सुरू होते. सत्ताबदल झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानुसार वाढीव किमतीसह केंद्र शासनाने पाणीपुरवठा योजनेचा समावेश ‘अमृत-२’मध्ये केला. यावेळी मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, शहर अभियंता सखाराम पानझडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राम लोलापोट, कार्यकारी अभियंता अजयसिंग, महापालिकेचे एम. बी. काझी, किरण धांडे, बाविस्कर यांच्यासह ‘पीएमसी’चे समीर जोशी उपस्थित होते.

सात दिवसांत २४ तास पाणी पण...सध्याच्या पाणीपुरवठा योजनेत नळाला मीटर बसविण्याचा समावेश नसून आगामी काळात केंद्र शासनाचे पथक आढावा घेईल. सात दिवस २४ तास पाणी देण्यासाठी मीटर लावणे गरजेचे आहे. नळाला मीटर लावण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, केंद्राने देशातील ८० शहरांना २४ तास सात दिवस पाणी देण्यासाठी योजना जाहीर केली आहे. त्यात औरंगाबादच्या समावेशासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश एमजेपीला दिल्याचे कराड म्हणाले.

उद्भव विहिरीला लागणार दोन वर्षे---पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या परवानग्या केंद्र शासनाने दिल्या आहेत. जायकवाडी धरणातील ‘हेडवर्क’च्या कामाला किमान दोन वर्षे लागतील. उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी कमी झाल्यावर काम सुरू होईल. गरज पडल्यास जलसंपदा विभागाची बैठक घेऊ, असे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांनी सांगितले.

महापालिकेला भरावे लागणार ८१० कोटी‘अमृत-२’ योजनेत केंद्राचा २५ टक्के, राज्याचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार महापालिकेला ८१० कोटी रुपये भरावे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. त्यावर लवकरच राज्य, केंद्र व महापालिकेची बैठक घेऊ, असे आश्वासन कराड यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीBhagwat Karadडॉ. भागवत