शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:38 IST

राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे चुकीच्या दिशेने जाताना ट्रकखाली येऊन बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी दुपारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. परंतु त्याच रस्त्यावरून वाहनचालक राँगसाईडने बिनधास्त जात होते. त्यांच्यावर अपघाताचा काहीही परिणाम दिसून आला नाही. 

अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. शासनाने वाहनचालकांसाठी वाहतूक नियमावलीही तयार केली आहे. आरटीओकडून वाहन चालविण्याचे लायसन्स घेण्यापूर्वी वाहतूक नियमांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रत्येक व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त होते. मात्र, लायसन्स हातात मिळाल्यानंतर वाहतूक नियम पायदळी तुडविण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येतो. प्रत्येक वाहतूक सिग्नलवर न थांबता वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, असे बेशिस्त वाहनचालक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना धडकून स्वत:सह इतरांचे प्राणही धोक्यात घालतात. 

अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींपैकी राँगसाईड वाहने चालविणे हे प्रमुख कारण आहे. गुरुवारी बीड बायपास रस्त्यावर राँगसाईडने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या ट्रकबरोबर टक्कर झाली आणि या घटनेत त्यांना प्राणास मुकावे लागले. बीड बायपास रस्त्यावर राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बाळापूर फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने राँगसाईड वाहने पळविण्याचे दहा ठिकाण आहेत. राँगसाईडने धावणाऱ्या वाहनांमुळे गतवर्षी एमआयटी कॉलेजजवळ एका मोपेडस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

जालना रस्त्यावरील अग्रसेन महाराज चौक ते उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, तसेच उच्च न्यायालय सिग्नलकडून राज पेट्रोलपंपादरम्यान राँगसाईड वाहनचालक पळताना दिसतात. विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलीस असेल तर राँगसाईड वाहतूक बंद असते. यासोबतच जिल्हा बँकेसमोर आणि जिल्हा कोर्टासमोरून अन्वीकर बिल्डिंगच्या दिशेने राँगसाईड वाहने सुसाट असतात. नूतन कॉलनीतून क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता, तीन वर्षांपूर्वी बंजारा चौक बंद क रण्यात आला. तेव्हापासून अनेक वाहनचालक जालना रोडवरील अमरप्रीत चौकात जाण्यासाठी समाजकल्याण भवनसमोरून राँगसाईडने वाहने नेणे पसंत करतात. मिलकॉर्नर चौकाकडून तिबेटियन स्वेटर मार्केटसमोरून शेकडो रिक्षाचालक, दुचाकीचालक राँगसाईडने मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. तसेच बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यानाकडून कार्तिकी हॉटेलकडे वाहनचालक राँगसाईडने जातात. 

वाहतूक पोलिसांकडून कारवाई अपेक्षितअपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राँगसाईड स्पॉटकडे वाहतूक पोलिसांनी कायमस्वरुपी उपाय करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस तेथे उपस्थित असेल तर राँगसाईड वाहतूक बंद होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस