शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

औरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:38 IST

राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे चुकीच्या दिशेने जाताना ट्रकखाली येऊन बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी दुपारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. परंतु त्याच रस्त्यावरून वाहनचालक राँगसाईडने बिनधास्त जात होते. त्यांच्यावर अपघाताचा काहीही परिणाम दिसून आला नाही. 

अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. शासनाने वाहनचालकांसाठी वाहतूक नियमावलीही तयार केली आहे. आरटीओकडून वाहन चालविण्याचे लायसन्स घेण्यापूर्वी वाहतूक नियमांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रत्येक व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त होते. मात्र, लायसन्स हातात मिळाल्यानंतर वाहतूक नियम पायदळी तुडविण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येतो. प्रत्येक वाहतूक सिग्नलवर न थांबता वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, असे बेशिस्त वाहनचालक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना धडकून स्वत:सह इतरांचे प्राणही धोक्यात घालतात. 

अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींपैकी राँगसाईड वाहने चालविणे हे प्रमुख कारण आहे. गुरुवारी बीड बायपास रस्त्यावर राँगसाईडने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या ट्रकबरोबर टक्कर झाली आणि या घटनेत त्यांना प्राणास मुकावे लागले. बीड बायपास रस्त्यावर राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बाळापूर फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने राँगसाईड वाहने पळविण्याचे दहा ठिकाण आहेत. राँगसाईडने धावणाऱ्या वाहनांमुळे गतवर्षी एमआयटी कॉलेजजवळ एका मोपेडस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

जालना रस्त्यावरील अग्रसेन महाराज चौक ते उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, तसेच उच्च न्यायालय सिग्नलकडून राज पेट्रोलपंपादरम्यान राँगसाईड वाहनचालक पळताना दिसतात. विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलीस असेल तर राँगसाईड वाहतूक बंद असते. यासोबतच जिल्हा बँकेसमोर आणि जिल्हा कोर्टासमोरून अन्वीकर बिल्डिंगच्या दिशेने राँगसाईड वाहने सुसाट असतात. नूतन कॉलनीतून क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता, तीन वर्षांपूर्वी बंजारा चौक बंद क रण्यात आला. तेव्हापासून अनेक वाहनचालक जालना रोडवरील अमरप्रीत चौकात जाण्यासाठी समाजकल्याण भवनसमोरून राँगसाईडने वाहने नेणे पसंत करतात. मिलकॉर्नर चौकाकडून तिबेटियन स्वेटर मार्केटसमोरून शेकडो रिक्षाचालक, दुचाकीचालक राँगसाईडने मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. तसेच बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यानाकडून कार्तिकी हॉटेलकडे वाहनचालक राँगसाईडने जातात. 

वाहतूक पोलिसांकडून कारवाई अपेक्षितअपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राँगसाईड स्पॉटकडे वाहतूक पोलिसांनी कायमस्वरुपी उपाय करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस तेथे उपस्थित असेल तर राँगसाईड वाहतूक बंद होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस