शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

औरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:38 IST

राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे चुकीच्या दिशेने जाताना ट्रकखाली येऊन बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी दुपारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. परंतु त्याच रस्त्यावरून वाहनचालक राँगसाईडने बिनधास्त जात होते. त्यांच्यावर अपघाताचा काहीही परिणाम दिसून आला नाही. 

अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. शासनाने वाहनचालकांसाठी वाहतूक नियमावलीही तयार केली आहे. आरटीओकडून वाहन चालविण्याचे लायसन्स घेण्यापूर्वी वाहतूक नियमांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रत्येक व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त होते. मात्र, लायसन्स हातात मिळाल्यानंतर वाहतूक नियम पायदळी तुडविण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येतो. प्रत्येक वाहतूक सिग्नलवर न थांबता वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, असे बेशिस्त वाहनचालक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना धडकून स्वत:सह इतरांचे प्राणही धोक्यात घालतात. 

अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींपैकी राँगसाईड वाहने चालविणे हे प्रमुख कारण आहे. गुरुवारी बीड बायपास रस्त्यावर राँगसाईडने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या ट्रकबरोबर टक्कर झाली आणि या घटनेत त्यांना प्राणास मुकावे लागले. बीड बायपास रस्त्यावर राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बाळापूर फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने राँगसाईड वाहने पळविण्याचे दहा ठिकाण आहेत. राँगसाईडने धावणाऱ्या वाहनांमुळे गतवर्षी एमआयटी कॉलेजजवळ एका मोपेडस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

जालना रस्त्यावरील अग्रसेन महाराज चौक ते उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, तसेच उच्च न्यायालय सिग्नलकडून राज पेट्रोलपंपादरम्यान राँगसाईड वाहनचालक पळताना दिसतात. विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलीस असेल तर राँगसाईड वाहतूक बंद असते. यासोबतच जिल्हा बँकेसमोर आणि जिल्हा कोर्टासमोरून अन्वीकर बिल्डिंगच्या दिशेने राँगसाईड वाहने सुसाट असतात. नूतन कॉलनीतून क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता, तीन वर्षांपूर्वी बंजारा चौक बंद क रण्यात आला. तेव्हापासून अनेक वाहनचालक जालना रोडवरील अमरप्रीत चौकात जाण्यासाठी समाजकल्याण भवनसमोरून राँगसाईडने वाहने नेणे पसंत करतात. मिलकॉर्नर चौकाकडून तिबेटियन स्वेटर मार्केटसमोरून शेकडो रिक्षाचालक, दुचाकीचालक राँगसाईडने मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. तसेच बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यानाकडून कार्तिकी हॉटेलकडे वाहनचालक राँगसाईडने जातात. 

वाहतूक पोलिसांकडून कारवाई अपेक्षितअपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राँगसाईड स्पॉटकडे वाहतूक पोलिसांनी कायमस्वरुपी उपाय करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस तेथे उपस्थित असेल तर राँगसाईड वाहतूक बंद होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस