शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:57 IST

सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ कशामुळे आली?

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. परिणामी लाखो औरंगाबादकरांना उन्हाळ्याचा कडाका सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सामान्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुंतले आहेत, तर प्रशासन वितरण व्यवस्थेवर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतो आहे.

वर्षभरापासून कचऱ्याच्या समस्येने शहर गांजले आहे, तर दहा वर्षांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला नागरिक सामोरे जात आहेत. ११५ वॉर्डांपैकी ५० टक्के वॉर्डातही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेची वितरण व्यवस्था कुठे तरी सदोष असल्याची टीकेची झोड सर्वत्र उठत आहे. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी शहर पाणीपुरवठ्यावर बोलताना सांगितले, येथील पाण्याचे हिशेब असे कसे काय होतात. गळती आणि चोरींवर मात करीत ११० एमएलडी पाणी येते. शहराला १६० एमएलडी पाण्याची गरज आहे.

११० मधून १०० एमएलडी जरी आले तरी हे  पाणी १६ ते १७ लाख लोकसंख्येला एकदाच पुरणे शक्य नाही. त्यामुळे दिवसाआड किंवा दोन दिवसांआड म्हटले तरी २०० एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत शहराची तहान भागू शकते, हा साधा हिशोब आहे. पाणी जायकवाडीतून तर रोज उपसले जात आहे. मग शहरात सात ते आठ दिवसांनी पाणी का येत आहे. काही ठिकाणी रोज येते, कुठे तीन दिवसांनी येते. असे वर्तमानपत्रातून छापून येते.

पालिकेचे वितरणाचे हिशेब का चुकत आहेत. सामान्य नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नाही. मनपाचा तांत्रिक माणूस कोण आहे, त्याला याबाबतचा अभ्यास का नाही. जलकुंभांचा आढावा का घेतला जात नाही. झोननिहाय जलकुंभ भरावेत आणि त्यातून पाणी वितरित करावे. नऊ झोनअंतर्गत किती जलकुंभ आहेत. त्याचा आढावा घेऊन वितरण का होत नाही.

पाण्याचे गणित चुकतेय कुठे व कसे दोन दिवसांत २२० एमएलडी पाणी येते. १६० एमएलडी जर शहराला दोन दिवसांत मिळाले तरी ६० एलएलडी पाणी शिल्लक राहते. ते पाणी ज्या वसाहतींत नळ नाही, तिकडे देता येते. झोनवाईज जलकुं भांचा, लोकसंख्येचा विचार करावा. साध्या माणसाला कळणारे हे गणित पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला का कळत नाही. ११० एमएलडी रोज पाणी येते. ते पण दिवसाआड किंवा दोन दिवसांआड द्यायचे आहे. जायकवाडीतील पाणी दीड ते दोन वर्षे पुरेल. पाणी असताना सामान्य नागरिकांचा असा छळ होणे अयोग्य आहे. झोननिहाय लोकसंख्या आणि पाणी वितरणाचा हिशोब झाल्यास ताबडतोब चोरी होते की गळती हे समोर येईल. आकाशवाणीवर पाण्याची गरज आणि कुटुंब यावर भाषण देण्यापेक्षा पूर्ण औरंगाबादचा कुटुंब म्हणून का विचार होत नाही. जबाबदारी यंत्रणाप्रमुखांनी याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी