शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:57 IST

सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ कशामुळे आली?

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. परिणामी लाखो औरंगाबादकरांना उन्हाळ्याचा कडाका सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सामान्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुंतले आहेत, तर प्रशासन वितरण व्यवस्थेवर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतो आहे.

वर्षभरापासून कचऱ्याच्या समस्येने शहर गांजले आहे, तर दहा वर्षांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला नागरिक सामोरे जात आहेत. ११५ वॉर्डांपैकी ५० टक्के वॉर्डातही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेची वितरण व्यवस्था कुठे तरी सदोष असल्याची टीकेची झोड सर्वत्र उठत आहे. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी शहर पाणीपुरवठ्यावर बोलताना सांगितले, येथील पाण्याचे हिशेब असे कसे काय होतात. गळती आणि चोरींवर मात करीत ११० एमएलडी पाणी येते. शहराला १६० एमएलडी पाण्याची गरज आहे.

११० मधून १०० एमएलडी जरी आले तरी हे  पाणी १६ ते १७ लाख लोकसंख्येला एकदाच पुरणे शक्य नाही. त्यामुळे दिवसाआड किंवा दोन दिवसांआड म्हटले तरी २०० एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत शहराची तहान भागू शकते, हा साधा हिशोब आहे. पाणी जायकवाडीतून तर रोज उपसले जात आहे. मग शहरात सात ते आठ दिवसांनी पाणी का येत आहे. काही ठिकाणी रोज येते, कुठे तीन दिवसांनी येते. असे वर्तमानपत्रातून छापून येते.

पालिकेचे वितरणाचे हिशेब का चुकत आहेत. सामान्य नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नाही. मनपाचा तांत्रिक माणूस कोण आहे, त्याला याबाबतचा अभ्यास का नाही. जलकुंभांचा आढावा का घेतला जात नाही. झोननिहाय जलकुंभ भरावेत आणि त्यातून पाणी वितरित करावे. नऊ झोनअंतर्गत किती जलकुंभ आहेत. त्याचा आढावा घेऊन वितरण का होत नाही.

पाण्याचे गणित चुकतेय कुठे व कसे दोन दिवसांत २२० एमएलडी पाणी येते. १६० एमएलडी जर शहराला दोन दिवसांत मिळाले तरी ६० एलएलडी पाणी शिल्लक राहते. ते पाणी ज्या वसाहतींत नळ नाही, तिकडे देता येते. झोनवाईज जलकुं भांचा, लोकसंख्येचा विचार करावा. साध्या माणसाला कळणारे हे गणित पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला का कळत नाही. ११० एमएलडी रोज पाणी येते. ते पण दिवसाआड किंवा दोन दिवसांआड द्यायचे आहे. जायकवाडीतील पाणी दीड ते दोन वर्षे पुरेल. पाणी असताना सामान्य नागरिकांचा असा छळ होणे अयोग्य आहे. झोननिहाय लोकसंख्या आणि पाणी वितरणाचा हिशोब झाल्यास ताबडतोब चोरी होते की गळती हे समोर येईल. आकाशवाणीवर पाण्याची गरज आणि कुटुंब यावर भाषण देण्यापेक्षा पूर्ण औरंगाबादचा कुटुंब म्हणून का विचार होत नाही. जबाबदारी यंत्रणाप्रमुखांनी याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी