शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:57 IST

सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ कशामुळे आली?

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. परिणामी लाखो औरंगाबादकरांना उन्हाळ्याचा कडाका सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सामान्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुंतले आहेत, तर प्रशासन वितरण व्यवस्थेवर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतो आहे.

वर्षभरापासून कचऱ्याच्या समस्येने शहर गांजले आहे, तर दहा वर्षांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला नागरिक सामोरे जात आहेत. ११५ वॉर्डांपैकी ५० टक्के वॉर्डातही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेची वितरण व्यवस्था कुठे तरी सदोष असल्याची टीकेची झोड सर्वत्र उठत आहे. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी शहर पाणीपुरवठ्यावर बोलताना सांगितले, येथील पाण्याचे हिशेब असे कसे काय होतात. गळती आणि चोरींवर मात करीत ११० एमएलडी पाणी येते. शहराला १६० एमएलडी पाण्याची गरज आहे.

११० मधून १०० एमएलडी जरी आले तरी हे  पाणी १६ ते १७ लाख लोकसंख्येला एकदाच पुरणे शक्य नाही. त्यामुळे दिवसाआड किंवा दोन दिवसांआड म्हटले तरी २०० एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत शहराची तहान भागू शकते, हा साधा हिशोब आहे. पाणी जायकवाडीतून तर रोज उपसले जात आहे. मग शहरात सात ते आठ दिवसांनी पाणी का येत आहे. काही ठिकाणी रोज येते, कुठे तीन दिवसांनी येते. असे वर्तमानपत्रातून छापून येते.

पालिकेचे वितरणाचे हिशेब का चुकत आहेत. सामान्य नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नाही. मनपाचा तांत्रिक माणूस कोण आहे, त्याला याबाबतचा अभ्यास का नाही. जलकुंभांचा आढावा का घेतला जात नाही. झोननिहाय जलकुंभ भरावेत आणि त्यातून पाणी वितरित करावे. नऊ झोनअंतर्गत किती जलकुंभ आहेत. त्याचा आढावा घेऊन वितरण का होत नाही.

पाण्याचे गणित चुकतेय कुठे व कसे दोन दिवसांत २२० एमएलडी पाणी येते. १६० एमएलडी जर शहराला दोन दिवसांत मिळाले तरी ६० एलएलडी पाणी शिल्लक राहते. ते पाणी ज्या वसाहतींत नळ नाही, तिकडे देता येते. झोनवाईज जलकुं भांचा, लोकसंख्येचा विचार करावा. साध्या माणसाला कळणारे हे गणित पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला का कळत नाही. ११० एमएलडी रोज पाणी येते. ते पण दिवसाआड किंवा दोन दिवसांआड द्यायचे आहे. जायकवाडीतील पाणी दीड ते दोन वर्षे पुरेल. पाणी असताना सामान्य नागरिकांचा असा छळ होणे अयोग्य आहे. झोननिहाय लोकसंख्या आणि पाणी वितरणाचा हिशोब झाल्यास ताबडतोब चोरी होते की गळती हे समोर येईल. आकाशवाणीवर पाण्याची गरज आणि कुटुंब यावर भाषण देण्यापेक्षा पूर्ण औरंगाबादचा कुटुंब म्हणून का विचार होत नाही. जबाबदारी यंत्रणाप्रमुखांनी याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी