शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:30 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देशाश्वतीच नाही : हलगर्जीपणा झाकण्यासाठी बदलले वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला. शहरातील १५ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना मात्र नियोजनाचे राजकारण सुरू झाले आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनीच पाण्याचा प्रश्न हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा केला. दोन दिवसाआड पाणी देण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १३५ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असताना नियोजनाने दोन दिवसांआड पाणी शहराला दिले जाऊ शकते. संपूर्ण शहरात दोन दिवसांआडच पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक का केले? याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात करू, असे त्यांनी गुरुवारी (दि.१०) स्पष्ट केले. प्रभारी आयुक्तांना अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा महापौरांनी केला.शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड व आंदोलने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी तीन दिवसांआडचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले. नव्या वेळापत्रकाला मंजुरीही देण्यात आली. शुक्रवारपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, तीन दिवसांआड पाणी देण्यास महापौरांनी विरोध केला होता. सध्या १३५ एमएलडी दररोज पाणी मिळते. दोन दिवसांत हे पाणी २७० एमएलडी होते. फक्त प्रशासनाचे नियोजन नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. शहराला दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.पाण्यासाठी शहर व्याकुळप्रत्येक नागरिकाच्या ५७ ते ६० लिटर पाण्याची चोरी होण्याचा अंदाज आहे. जायकवाडीतून १५६ पैकी १४७ ते १५० एमएलडी पाणी उपसले जाते.शहराला येते १२० ते १३० एमएलडी पाणी येते. २५ ते ३० एमएलडी पाण्याची चोरी होते. शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या पुढे-मागे आहे. दरडोई १३५ लिटर पाणी देण्याचा नियम आहे. मनपाकडून ७८ ते ८० लिटर पाणी दरडोई पुरविले जात नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात