शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:30 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देशाश्वतीच नाही : हलगर्जीपणा झाकण्यासाठी बदलले वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला. शहरातील १५ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना मात्र नियोजनाचे राजकारण सुरू झाले आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनीच पाण्याचा प्रश्न हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा केला. दोन दिवसाआड पाणी देण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १३५ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असताना नियोजनाने दोन दिवसांआड पाणी शहराला दिले जाऊ शकते. संपूर्ण शहरात दोन दिवसांआडच पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक का केले? याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात करू, असे त्यांनी गुरुवारी (दि.१०) स्पष्ट केले. प्रभारी आयुक्तांना अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा महापौरांनी केला.शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड व आंदोलने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी तीन दिवसांआडचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले. नव्या वेळापत्रकाला मंजुरीही देण्यात आली. शुक्रवारपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, तीन दिवसांआड पाणी देण्यास महापौरांनी विरोध केला होता. सध्या १३५ एमएलडी दररोज पाणी मिळते. दोन दिवसांत हे पाणी २७० एमएलडी होते. फक्त प्रशासनाचे नियोजन नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. शहराला दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.पाण्यासाठी शहर व्याकुळप्रत्येक नागरिकाच्या ५७ ते ६० लिटर पाण्याची चोरी होण्याचा अंदाज आहे. जायकवाडीतून १५६ पैकी १४७ ते १५० एमएलडी पाणी उपसले जाते.शहराला येते १२० ते १३० एमएलडी पाणी येते. २५ ते ३० एमएलडी पाण्याची चोरी होते. शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या पुढे-मागे आहे. दरडोई १३५ लिटर पाणी देण्याचा नियम आहे. मनपाकडून ७८ ते ८० लिटर पाणी दरडोई पुरविले जात नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात