शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:30 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला.

ठळक मुद्देशाश्वतीच नाही : हलगर्जीपणा झाकण्यासाठी बदलले वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला. शहरातील १५ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना मात्र नियोजनाचे राजकारण सुरू झाले आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनीच पाण्याचा प्रश्न हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा केला. दोन दिवसाआड पाणी देण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १३५ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असताना नियोजनाने दोन दिवसांआड पाणी शहराला दिले जाऊ शकते. संपूर्ण शहरात दोन दिवसांआडच पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक का केले? याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात करू, असे त्यांनी गुरुवारी (दि.१०) स्पष्ट केले. प्रभारी आयुक्तांना अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा महापौरांनी केला.शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड व आंदोलने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी तीन दिवसांआडचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले. नव्या वेळापत्रकाला मंजुरीही देण्यात आली. शुक्रवारपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, तीन दिवसांआड पाणी देण्यास महापौरांनी विरोध केला होता. सध्या १३५ एमएलडी दररोज पाणी मिळते. दोन दिवसांत हे पाणी २७० एमएलडी होते. फक्त प्रशासनाचे नियोजन नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. शहराला दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.पाण्यासाठी शहर व्याकुळप्रत्येक नागरिकाच्या ५७ ते ६० लिटर पाण्याची चोरी होण्याचा अंदाज आहे. जायकवाडीतून १५६ पैकी १४७ ते १५० एमएलडी पाणी उपसले जाते.शहराला येते १२० ते १३० एमएलडी पाणी येते. २५ ते ३० एमएलडी पाण्याची चोरी होते. शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या पुढे-मागे आहे. दरडोई १३५ लिटर पाणी देण्याचा नियम आहे. मनपाकडून ७८ ते ८० लिटर पाणी दरडोई पुरविले जात नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात