शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला विमानांची प्रतीक्षा तर दुसरीकडे शासनाकडून शिर्डी विमानतळाला झुकते माप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:19 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून आता २० सप्टेंबरपासून दिल्ली, तर १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून आता २० सप्टेंबरपासून दिल्ली, तर १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन विमान कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, ारुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. दिल्लीहून विमानसेवेने औरंगाबादला येऊन शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या संख्येवर आगामी कालावधीत परिणाम होणार आहे. 

शिर्डी विमानतळाचे गतवर्षी १ आॅक्टोबर रोजी उद्घाटन झाले होते़ यानंतर मुंबई व हैदराबाद सेवा नियमित सुरू झाली़ अवघ्या वर्षभरातच शिर्डी विमानतळाने कनेक्टिव्हिटीत टेकआॅफ घेतला आहे. शिर्डीतून दिल्लीसाठी भाविकांची मोठी मागणी आहे़ त्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबरपासून दिल्ली-शिर्डी-दिल्ली ही विमानसेवा सुरू होत आहे़ स्पाईस-जेट-एअरलाईन्सचे बोर्इंग ७३७-८०० हे १८९ आसनी विमान दुपारी दिल्लीतून १२़४५ वाजता निघून २़३० वाजता शिर्डीत पोहोचेल़ अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर हे विमान तीन वाजता दिल्लीसाठी शिर्डीतून उड्डाण करील़ १ आॅक्टोबरपासून स्पाईस जेटचे क्यू-४०० हे ७८ आसनी विमान बंगळुरूहून सकाळी शिर्डीला येईल व येथून मुंबईला जाईल. 

शिर्डीत डिसेंबर अखेर दहा विमानेशिर्डीहून डिसेंबर अखेर रोज दहा विमाने सुरू करून देशातील विविध शहरे शिर्डीला जोडली जाणार आहेत, अशी माहिती सोमवारी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरूहोऊ शकलेली नाही. विमानतळ प्राधिकरणासह उद्योजकांनी राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांना साकडे घातले; परंतु विमानसेवेत भर पडलेली नाही. दिल्लीत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत औरंगाबादेतून नव्या विमानसेवेसंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिर्डीचा विमानतळाचा फटकाशिर्डी विमानतळाचा औरंगाबाद विमानतळास निश्चित फटका बसतो आहे. शिर्डीहून हळूहळू इतर ठिकाणांसाठी सेवा सुरूहोतील. त्यामुळे औरंगाबादेतील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची गरज आहे. -जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

९ दिवसांपासून ट्रू जेट रद्दआॅपरेशनल रिजनमुळे ट्रू जेटची विमानसेवा २७ आॅगस्टपासून विस्कळीत झाली आहे. औरंगाबाद-हैदराबाद हे विमान मंगळवारीदेखील रद्द राहिले. त्यामुळे बुकिंग केलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही विमानसेवा कधी सुरळीत होणार, याकडे लक्ष लागले आहे. विमान उपलब्धतेबरोबर प्रवासी संख्येच्या कारणामुळे हे विमान रद्द होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारShirdi Airportशिर्डी विमानतळ