शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादला विमानांची प्रतीक्षा तर दुसरीकडे शासनाकडून शिर्डी विमानतळाला झुकते माप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:19 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे.

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून आता २० सप्टेंबरपासून दिल्ली, तर १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून आता २० सप्टेंबरपासून दिल्ली, तर १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन विमान कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, ारुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. दिल्लीहून विमानसेवेने औरंगाबादला येऊन शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या संख्येवर आगामी कालावधीत परिणाम होणार आहे. 

शिर्डी विमानतळाचे गतवर्षी १ आॅक्टोबर रोजी उद्घाटन झाले होते़ यानंतर मुंबई व हैदराबाद सेवा नियमित सुरू झाली़ अवघ्या वर्षभरातच शिर्डी विमानतळाने कनेक्टिव्हिटीत टेकआॅफ घेतला आहे. शिर्डीतून दिल्लीसाठी भाविकांची मोठी मागणी आहे़ त्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबरपासून दिल्ली-शिर्डी-दिल्ली ही विमानसेवा सुरू होत आहे़ स्पाईस-जेट-एअरलाईन्सचे बोर्इंग ७३७-८०० हे १८९ आसनी विमान दुपारी दिल्लीतून १२़४५ वाजता निघून २़३० वाजता शिर्डीत पोहोचेल़ अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर हे विमान तीन वाजता दिल्लीसाठी शिर्डीतून उड्डाण करील़ १ आॅक्टोबरपासून स्पाईस जेटचे क्यू-४०० हे ७८ आसनी विमान बंगळुरूहून सकाळी शिर्डीला येईल व येथून मुंबईला जाईल. 

शिर्डीत डिसेंबर अखेर दहा विमानेशिर्डीहून डिसेंबर अखेर रोज दहा विमाने सुरू करून देशातील विविध शहरे शिर्डीला जोडली जाणार आहेत, अशी माहिती सोमवारी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरूहोऊ शकलेली नाही. विमानतळ प्राधिकरणासह उद्योजकांनी राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांना साकडे घातले; परंतु विमानसेवेत भर पडलेली नाही. दिल्लीत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत औरंगाबादेतून नव्या विमानसेवेसंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिर्डीचा विमानतळाचा फटकाशिर्डी विमानतळाचा औरंगाबाद विमानतळास निश्चित फटका बसतो आहे. शिर्डीहून हळूहळू इतर ठिकाणांसाठी सेवा सुरूहोतील. त्यामुळे औरंगाबादेतील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची गरज आहे. -जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

९ दिवसांपासून ट्रू जेट रद्दआॅपरेशनल रिजनमुळे ट्रू जेटची विमानसेवा २७ आॅगस्टपासून विस्कळीत झाली आहे. औरंगाबाद-हैदराबाद हे विमान मंगळवारीदेखील रद्द राहिले. त्यामुळे बुकिंग केलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही विमानसेवा कधी सुरळीत होणार, याकडे लक्ष लागले आहे. विमान उपलब्धतेबरोबर प्रवासी संख्येच्या कारणामुळे हे विमान रद्द होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारShirdi Airportशिर्डी विमानतळ