शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

औरंगाबादचे रस्ते गुन्हेगारांना मोकळे; दीड महिन्यात गंभीर गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:46 IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात गंभीर गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

ठळक मुद्देशहरात गुंडांची वाढती दहशत किरकोळ कारणावरून थेट शस्त्राने हल्ला करण्याचे गुन्हे वाढले

औरंगाबाद : खून, खुनाचा प्रयत्न, मंगळसूत्र चोरी आणि धारदार वस्तूने मारहाण करून लुटमारीच्या घटनांनी नव्या वर्षातील दीड महिन्यातच शतक  पार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चाकू, सुऱ्यासह तलवारीसारखे घातक शस्त्र सोबत घेऊन फिरताहेत. किरकोळ कारणावरून थेट शस्त्राने हल्ला करण्याचे गुन्हे वाढले आहेत. 

शिवजयंती मिरवणुकीत पुंडलिकनगरात श्रीकांत गोपीचंद शिंदे या २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या तीन दिवस आधीच आरोपींनी भारतनगरात एका तरुणाला घराबाहेर बोलावून प्राणघातक हल्ला केला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापकाचा निर्घृण खून करून आरोपी पसार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. शहरातील गुंड उघडपणे तलवार घेऊन फिरण्याएवढे निर्भय झाले आहेत. यातूनच फ्लिपकार्टसारख्या आॅनलाईन बाजारातून शहरातील ४० हून अधिक तरुणांनी तलवारी मागविल्या होत्या. पोलिसांना न जुमानता शिवजयंती मिरवणुकीत अनेक तरुण तलवारीसह सहभागी झाले होते. तलवारीसह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सशस्त्र हाणामारीच्या घटना शहरात सतत घडत आहेत. गुंडांना ट्रॅप करण्यासाठी पोलिसांकडून अचानक राबविले जाणारे ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सारख्या मोहिमा कमी झाल्याने गुन्हेगारी फोफावते आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शस्त्राने हल्ला केल्याच्या तब्बल १०९ घटनाशस्त्राने मारहाण करून दुखापत करण्याच्या तब्बल १०९ घटनांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे, तर  दुचाकीस्वार चोरट्यांनी विविध ७ ठिकाणांहून पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. या घटना समर्थनगर, उल्कानगरी, ज्योतीनगर, जवाहरनगर, छावणी आणि सातारा परिसरात घडल्या. लुटमार आणि जबरी चोरीच्या तब्बल एक डझन घटनांची नोंद शहरात झाली.  

गतवर्षीच्या तुलनेत रस्त्यावरील वाटमारी, जबरी चोरी,मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी झाल्या. मारहाण करून साधी व गंभीर दुखापत करण्याच्या घटना घडल्या आहेत. तलवारी घेऊन फिरणाऱ्यांची माहिती मिळताच पोलिसांकडून लगेच त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाते.     - निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस