शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतली विशेष शाखेची ‘खबर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:18 PM

शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.

औरंगाबाद : ‘पोलिसांचा तिसरा डोळा’ अशी कधी काळी ओळख असलेल्या विशेष शाखेला अनेक घटनांची कुणकुणच लागत नाही. शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी या शाखेची चांगलीच ‘खबर’ घेतली.

पत्रकारांसोबत दुपारी गप्पा मारताना मिलिंद भारंबे यांनी नमूद केले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरात कुठे हिंसात्मक घटना घडेत आहेत, याची सर्वात अगोदर माहिती याच विभागांना असायला हवी. कोरेगाव-भीमा आणि मिटमिटा येथील घटनांवरून या दोन्ही शाखा अपयशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. या विभागांनीच सर्वप्रथम आम्हाला माहिती देणे अपेक्षित असते. पोलिसांकडून ज्या पद्धतीने सतर्कता बाळगायला हवी तशी बाळगण्यात आलेली नाही. शहरात कचराकोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. राजकीय मंडळींच्या हालचालींवर कडक नजर ठेवायला हवी. पोलीस कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. 

पैठण रोडवर कांचनवाडी येथे दगडफेक, मिटमिटा येथील दंगलीची अगोदर माहिती पोलिसांना हवी होती. विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेला आपली मरगळ दूर झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे होता कामा नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे भारंबे यांनी नमूद केले.

टॅग्स :Milind Bharambeमिलिंद भारंबेCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद