शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणाऱ्या ५९ हजार नागरिकांवर कारवाई; तरीही शहर बेशिस्तच!

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2022 17:03 IST

महापालिकेच्या ‘नागरी मित्र’ पथकाने वसूल केला तब्बल ४ कोटींचा दंड, स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही.

औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणे, बंदी असलेल्या मांजाची, कॅरिबॅगची विक्री करणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने माजी सैनिकांचे ‘नागरी मित्र’ नावाचे एक पथक स्थापन केले. मागील चार वर्षांत या पथकाने औरंगाबादकरांकडून सर्वाधिक ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही शहराला शिस्त लागलेली नाही, हे विशेष.

स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही. स्वच्छतेत नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य अजिबात मिळत नाही. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर वाढल्याने नाल्यांमध्ये पाणी साचून राहत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचप्रमाणे कचरा कोंडीनंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढली.

युद्धपातळीवर माजी सैनिकांचे पथक स्थापन करून त्यांना दंडाचे अधिकार दिले. प्रारंभी रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा जाळणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा करणारे, अशा व्यक्तींविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पुढे बंदी घातलेल्या कॅरिबॅगची विक्री करणारे आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कोरोना संसर्ग काळात मास्क घालण्याची सक्ती केली होती. या आदेशाचा भंग करत विनामास्क बाहेर पडणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडूनही प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या सर्व कारवायांचा अहवाल घनकचरा विभागाच्या प्रमुखांकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या पथकाने केलेली कारवाई- बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर करणारे : ८,३०५- थुंकणे, कचरा जाळणे : २०,३१६- बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे : १,०१९- बायोमेडिकल वेस्ट : २८५- मांजा पतंग : ०५- क्लासेसचे पोस्टर : ११३- पाण्याची नासाडी : ६०८- विना मास्क : २८,४०८एकूण : ५९,०५९दंड वसूल : ३ कोटी ९९ लाख ३६ हजार ६०० रुपये

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान