शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणाऱ्या ५९ हजार नागरिकांवर कारवाई; तरीही शहर बेशिस्तच!

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2022 17:03 IST

महापालिकेच्या ‘नागरी मित्र’ पथकाने वसूल केला तब्बल ४ कोटींचा दंड, स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही.

औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणे, बंदी असलेल्या मांजाची, कॅरिबॅगची विक्री करणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने माजी सैनिकांचे ‘नागरी मित्र’ नावाचे एक पथक स्थापन केले. मागील चार वर्षांत या पथकाने औरंगाबादकरांकडून सर्वाधिक ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही शहराला शिस्त लागलेली नाही, हे विशेष.

स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही. स्वच्छतेत नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य अजिबात मिळत नाही. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर वाढल्याने नाल्यांमध्ये पाणी साचून राहत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचप्रमाणे कचरा कोंडीनंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढली.

युद्धपातळीवर माजी सैनिकांचे पथक स्थापन करून त्यांना दंडाचे अधिकार दिले. प्रारंभी रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा जाळणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा करणारे, अशा व्यक्तींविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पुढे बंदी घातलेल्या कॅरिबॅगची विक्री करणारे आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कोरोना संसर्ग काळात मास्क घालण्याची सक्ती केली होती. या आदेशाचा भंग करत विनामास्क बाहेर पडणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडूनही प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या सर्व कारवायांचा अहवाल घनकचरा विभागाच्या प्रमुखांकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या पथकाने केलेली कारवाई- बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर करणारे : ८,३०५- थुंकणे, कचरा जाळणे : २०,३१६- बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे : १,०१९- बायोमेडिकल वेस्ट : २८५- मांजा पतंग : ०५- क्लासेसचे पोस्टर : ११३- पाण्याची नासाडी : ६०८- विना मास्क : २८,४०८एकूण : ५९,०५९दंड वसूल : ३ कोटी ९९ लाख ३६ हजार ६०० रुपये

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान