शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणाऱ्या ५९ हजार नागरिकांवर कारवाई; तरीही शहर बेशिस्तच!

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2022 17:03 IST

महापालिकेच्या ‘नागरी मित्र’ पथकाने वसूल केला तब्बल ४ कोटींचा दंड, स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही.

औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणे, बंदी असलेल्या मांजाची, कॅरिबॅगची विक्री करणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने माजी सैनिकांचे ‘नागरी मित्र’ नावाचे एक पथक स्थापन केले. मागील चार वर्षांत या पथकाने औरंगाबादकरांकडून सर्वाधिक ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही शहराला शिस्त लागलेली नाही, हे विशेष.

स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही. स्वच्छतेत नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य अजिबात मिळत नाही. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर वाढल्याने नाल्यांमध्ये पाणी साचून राहत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचप्रमाणे कचरा कोंडीनंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढली.

युद्धपातळीवर माजी सैनिकांचे पथक स्थापन करून त्यांना दंडाचे अधिकार दिले. प्रारंभी रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा जाळणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा करणारे, अशा व्यक्तींविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पुढे बंदी घातलेल्या कॅरिबॅगची विक्री करणारे आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कोरोना संसर्ग काळात मास्क घालण्याची सक्ती केली होती. या आदेशाचा भंग करत विनामास्क बाहेर पडणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडूनही प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या सर्व कारवायांचा अहवाल घनकचरा विभागाच्या प्रमुखांकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या पथकाने केलेली कारवाई- बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर करणारे : ८,३०५- थुंकणे, कचरा जाळणे : २०,३१६- बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे : १,०१९- बायोमेडिकल वेस्ट : २८५- मांजा पतंग : ०५- क्लासेसचे पोस्टर : ११३- पाण्याची नासाडी : ६०८- विना मास्क : २८,४०८एकूण : ५९,०५९दंड वसूल : ३ कोटी ९९ लाख ३६ हजार ६०० रुपये

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान