शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाडाने ६० प्रवासी ६ तास खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 4:21 PM

दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजता उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले

ठळक मुद्दे६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या  ट्रू जेट कंपनीच्या औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना रविवारी (दि. ११) घडली. विमान दुरुस्त होऊन हैदराबादकडे रवाना होईल, या अपेक्षेने दुपारी ४ वाजता आलेल्या ६०  प्रवाशांना रात्री १० वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. परंतु अखेर विमान उड्डाण घेऊ शकणार नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या प्रकाराविषयी संताप व्यक्त करीत  प्रवासीविमानतळाबाहेर पडले.

औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी प्रवासी विमानतळार दाखल झाले होते. ६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवासी दुपारी ४ वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते. हैदराबाद- औरंगाबाद विमान विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर हे विमान परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत होते. त्याच वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. वैमानिक आणि  ट्रू जेट कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असताना सर्व प्रवासी विमानतळावर बसून होते. प्रारंभी विमानास नेमक्या कोणत्या कारणांनी उशीर होत आहे, याविषयी प्रवाशांना काहीही कल्पना देण्यात आली नाही. त्यानंतर विमान ग्राऊंड (तांत्रिक बिघाड) झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले. परंतु दुरुस्तीमध्ये रात्रीचे १० वाजले. विमान दुरुस्त होणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाले, असे  ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारपासून विमानतळावरहैदराबादला डॉक्टरांची अपॉइंमेंट होती. त्यामुळे दुपारी ३ वाजता विमानतळावर आले. परंतु विमान खराब झाल्याचे सांगून रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गैरसोय झाल्याचे स्नेहा छाबडा यांनी सांगितले.

१७ आॅगस्टपर्यंत उड्डाण रद्दचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद- हैदराबाद विमान रद्द होण्याचा प्रकार थांबत नाही. सलग सुट्या असताना १२ ते १७ आॅगस्टदरम्यान पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

ईदसाठी जायचे होतेभाचीला ईदसाठी हैदराबादला जायचे होते. तिचे आई-वडील हैदराबादला असतात. परंतु सहा तास बसवून ठेवल्यानंतर विमान रद्द झाल्याचे सांगितले. आता रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या सुविधेने जाणेही अशक्य असल्याचे अ‍ॅड. मोहंमद वसीमउल्ला म्हणाले. यावेळी आई-वडिलांच्या ओढीने सदर युवतीला अश्रू आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासीAirportविमानतळ