शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

औरंगाबादमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समाधान हेल्पलाईन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 1:56 PM

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिकाला सोमवारी पाचशे रुपयांच्या लाचेप्रकरणी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी हे दक्षतेचे व सतर्कतेचे पाऊल उचलले आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची विविध कामे मुख्यालय, पोलीस ठाणे स्तरावर असतात. ही कामे वेळेवर होत नाहीत, विलंबाने केली जातात, मुद्दामहून अडवून ठेवली जातात किंवा कामांसाठी लाचही मागितली जाते.  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद रुजू झाल्यापासून त्यांनी हळूहळू पोलीस प्रशासनाला कार्यक्षम बनविण्यावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत. लाच घेताना एकाला अटक होताच पोलीस आयुक्तांनी हे प्रकार टाळण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याची कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठी पोलिसांनी समाधान हेल्पलाईन (०२४०-२३२६५२७) सुरू केली आहे.

हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार या हेल्पलाईनवर कर्मचारी बिनधास्तपणे आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. खरे तर ही हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती; परंतु याबाबत कर्मचाऱ्यांना फारशी माहिती नसल्याने या हेल्पलाईनला प्रतिसादही मिळाला नव्हता. आता या प्रकरणानंतर पुन्हा हेल्पलाईन अ‍ॅक्टिव करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद