शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत परीक्षार्थीने गोंधळ घालत फाडली उत्तरपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:12 IST

महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात असाच प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : समाजशास्त्र विभागातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात असाच प्रकार घडला आहे. कॉपी पकडलेल्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका फाडत गोंधळ घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विद्यापीठातील समाजशास्त्र विभागामध्ये एम. फिल अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. २५ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेत पर्यवेक्षकाने एका विद्यार्थ्याची कॉपी पकडली. ही कॉपी जप्त केल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कॉपी पकडलेल्या पर्यवेक्षकालाच दमदाटी करीत उत्तरपत्रिका फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे विभागात गोंधळ उडाला. परीक्षार्थी विद्यार्थ्याने विभागातील प्राध्यापकांविषयी अर्वाच्च भाषा वापरली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या गोंधळात विभागातील प्राध्यापक डॉ. पद्माकर सहारे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती योग्यपणे हाताळल्यामुळे पुढील कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उत्तरपत्रिका फाडलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्याचेही समजते.एवढा गोंधळ होऊनही विभागाची बाहेर बदनामी होऊ नये, म्हणून याची कोठेही वाच्यता केली नाही. या विभागाचे प्रमुख डॉ. संजय साळुंके हे विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता आहेत. त्यांनीही संबंधित गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.शिकवले नसल्याचा गंभीर आरोपएम. फिलच्या परीक्षेत गोंधळ घालणाºया विद्यार्थ्याने परीक्षेतच प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. एम. फिलचा अभ्यासक्रम प्राध्यापकांनी शिकवलाच नसल्याचे ‘त्या’ विद्यार्थ्याचे म्हणणे होते. विभाग प्रमुख नियमितपणे विभागात येत नाहीत. प्रशासकीय इमारतीमध्येच असतात. अनेकवेळा सह्या घेण्यासाठी सुद्धा मुख्य इमारतीत जावे लागते. तेव्हा प्राध्यापकच शिकवत नाहीत, तर आम्हाला कशाला दोषी धरतात, असेही त्या विद्यार्थ्याने म्हटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या विद्यार्थ्याच्या आरोपावर विभागप्रमुखांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या२२२२विषयी विभागप्रमुख डॉ. संजय साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्याच्या या आरोपामुळे विद्यापीठात तासिका होत नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.नाईक महाविद्यालयातही प्रकरण दडपलेडिसेंबर महिन्यात व्यवस्थापनशास्त्र विषयाच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविली होती. याचा भंडाफोड होताच मोठा गदारोळ झाला होता. या सत्राच्या परीक्षेतही वसंतराव नाईक महाविद्यालयातून एका विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याने बाहेर पाठविली होती. हा विद्यार्थी वेळीच पकडण्यात आला. यात महाविद्यालयाची बदनामी होईल, या कारणामुळे सदरील प्रकरण प्राचार्यांनी दडपल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्या विद्यार्थ्यावर महाविद्यालयाने कारवाई केली आहे.

टॅग्स :examपरीक्षाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी