शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी औरंगाबाद मनपाचा डीपीआरच नाही; १०० कोटींच्या अनुदानावर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:23 IST

मराठवाड्यात लातूर, परभणीसह विविध नगर परिषदांचे डीपीआरही तयार झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेने पीएमसीही नियुक्त केले नाही. त्यामुळे महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र भियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासन राज्यातील महापालिका, नगर परिषदांना घसघशीत अनुदान उपलब्ध करून देत आहे. स्वच्छतेसाठी लागणार्‍या खर्चाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनानेच काही खाजगी प्रकल्प सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. अहवाल तयार नसल्याने महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र भियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासन राज्यातील महापालिका, नगर परिषदांना घसघशीत अनुदान उपलब्ध करून देत आहे. स्वच्छतेसाठी लागणार्‍या खर्चाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनानेच काही खाजगी प्रकल्प सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यात लातूर, परभणीसह विविध नगर परिषदांचे डीपीआरही तयार झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेने पीएमसीही नियुक्त केले नाही. त्यामुळे महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील महापालिका, नगर परिषदा सरसावल्या आहेत. नगरविकास विभागाने मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘इको प्रो’ या खाजगी प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक केली आहे. या कंपनीने मराठवाड्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे डीपीआर तयार केले आहेत. लवकरच ते शासनाकडे सादरही करण्यात येणार आहेत. शहर स्वच्छतेसाठी महापालिकांना लागणार्‍या निधीची तरतूद शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबाद महापालिकेला किमान १०० कोटींचे अनुदान प्राप्त होऊ शकते. शासनाने प्रकल्प सल्लागार समिती नेमलेली नसताना महापालिकेनेही ही औपचारिकता पूर्ण केलेली नाही. महापालिकेने स्वत:हून डीपीआर तयार करून शासनाकडे सादर करावा, अशी अपेक्षा नगरविकास विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कचरा नष्ट करण्याचे मोठे आव्हान 

शहरात कचर्‍याचा प्रश्न मागील काही दिवसांमध्ये गंभीर बनला आहे. नारेगाव येथे कचरा टाकण्यास शेतकर्‍यांनी मज्जाव केला होता. महापालिकेला कोणत्याही परिस्थितीत कचर्‍यावर प्रक्रिया करावीच लागणार आहे. दररोज मनपाकडे विविध संस्था, संघटना, कंपन्या आम्ही कचर्‍यावर प्रक्रिया करण्यास तयार आहोत, म्हणून प्रकल्प आराखडा सादर करीत आहेत. महापालिकेने यासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. 

प्रभागनिहाय कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे. या सर्व कामासाठी मनपाला किमान १०० कोटी रुपये लागणार आहेत. सध्या मनपाची तिजोरी रिकामी आहे. शासनाकडून निधी मिळू शकतो, पण त्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद