शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

स्वच्छतेसाठी औरंगाबाद मनपाचा डीपीआरच नाही; १०० कोटींच्या अनुदानावर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:23 IST

मराठवाड्यात लातूर, परभणीसह विविध नगर परिषदांचे डीपीआरही तयार झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेने पीएमसीही नियुक्त केले नाही. त्यामुळे महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र भियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासन राज्यातील महापालिका, नगर परिषदांना घसघशीत अनुदान उपलब्ध करून देत आहे. स्वच्छतेसाठी लागणार्‍या खर्चाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनानेच काही खाजगी प्रकल्प सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. अहवाल तयार नसल्याने महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र भियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासन राज्यातील महापालिका, नगर परिषदांना घसघशीत अनुदान उपलब्ध करून देत आहे. स्वच्छतेसाठी लागणार्‍या खर्चाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनानेच काही खाजगी प्रकल्प सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यात लातूर, परभणीसह विविध नगर परिषदांचे डीपीआरही तयार झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेने पीएमसीही नियुक्त केले नाही. त्यामुळे महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील महापालिका, नगर परिषदा सरसावल्या आहेत. नगरविकास विभागाने मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘इको प्रो’ या खाजगी प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक केली आहे. या कंपनीने मराठवाड्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे डीपीआर तयार केले आहेत. लवकरच ते शासनाकडे सादरही करण्यात येणार आहेत. शहर स्वच्छतेसाठी महापालिकांना लागणार्‍या निधीची तरतूद शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबाद महापालिकेला किमान १०० कोटींचे अनुदान प्राप्त होऊ शकते. शासनाने प्रकल्प सल्लागार समिती नेमलेली नसताना महापालिकेनेही ही औपचारिकता पूर्ण केलेली नाही. महापालिकेने स्वत:हून डीपीआर तयार करून शासनाकडे सादर करावा, अशी अपेक्षा नगरविकास विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कचरा नष्ट करण्याचे मोठे आव्हान 

शहरात कचर्‍याचा प्रश्न मागील काही दिवसांमध्ये गंभीर बनला आहे. नारेगाव येथे कचरा टाकण्यास शेतकर्‍यांनी मज्जाव केला होता. महापालिकेला कोणत्याही परिस्थितीत कचर्‍यावर प्रक्रिया करावीच लागणार आहे. दररोज मनपाकडे विविध संस्था, संघटना, कंपन्या आम्ही कचर्‍यावर प्रक्रिया करण्यास तयार आहोत, म्हणून प्रकल्प आराखडा सादर करीत आहेत. महापालिकेने यासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. 

प्रभागनिहाय कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे. या सर्व कामासाठी मनपाला किमान १०० कोटी रुपये लागणार आहेत. सध्या मनपाची तिजोरी रिकामी आहे. शासनाकडून निधी मिळू शकतो, पण त्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद