शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

औरंगाबाद जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:03 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.

ठळक मुद्देविभागात मिळाले दुसरे स्थान : मुलींचा निकाल ८४. ०६ टक्के लागला

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.शिक्षण मंडळाने १ मार्च ते २२ मार्चदरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर केला. यावर्षी राज्यपातळीवरच निकालाची मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्याचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यातही उमटले. जिल्ह्यातून ६५ हजार ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५० हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २५ हजार ५७२ मुलांचा आणि २४ हजार ४७९ मुलींचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून ३५ हजार ६४० मुले बसली होती, तर २९ हजार १२१ मुलींनी परीक्षा दिली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १२. ३१ टक्के अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.१३ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतऔरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी मिळवली आहे, तर प्रथम श्रेणीत २१ हजार १४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ४५ ते ५९ टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ हजार ५१० आहे. ३५ ते ४४ टक्क्यांदरम्यान गुण घेणाºया विद्यार्थ्यांचा आकडा १,९६९ एवढा आहे.सोमवारपासून गुणपडताळणी प्रक्रियादहावीच्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे. त्यांनी गुणपडताळणी अर्ज विहित नमुन्यात सोमवारी (दि.१०) ते १९ जूनपर्यंत संबंधित शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे करावेत. त्या अर्जासोबत संकेतस्थळावरील गुणपत्रिकेची छायाप्रत जोडावी लागेल, तसेच उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देण्याची सुविधाही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविषयाच्या उत्तरपत्रिकेला ४०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल,अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.चित्रकलेचे ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना गुणमंडळातर्फे कलास्वाद, स्काऊट गाईड, एनसीसी, वाहतूक सुरक्षा, आरोग्य व शारीरिक शिक्षण, अशा विविध प्रकारांत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविणाºया विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना चित्रकला प्रकारात गुण देण्यात आले. एसीसीमध्ये १ आणि क्रीडामध्ये ४२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा