शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:03 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.

ठळक मुद्देविभागात मिळाले दुसरे स्थान : मुलींचा निकाल ८४. ०६ टक्के लागला

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.शिक्षण मंडळाने १ मार्च ते २२ मार्चदरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर केला. यावर्षी राज्यपातळीवरच निकालाची मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्याचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यातही उमटले. जिल्ह्यातून ६५ हजार ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५० हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २५ हजार ५७२ मुलांचा आणि २४ हजार ४७९ मुलींचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून ३५ हजार ६४० मुले बसली होती, तर २९ हजार १२१ मुलींनी परीक्षा दिली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १२. ३१ टक्के अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.१३ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतऔरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी मिळवली आहे, तर प्रथम श्रेणीत २१ हजार १४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ४५ ते ५९ टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ हजार ५१० आहे. ३५ ते ४४ टक्क्यांदरम्यान गुण घेणाºया विद्यार्थ्यांचा आकडा १,९६९ एवढा आहे.सोमवारपासून गुणपडताळणी प्रक्रियादहावीच्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे. त्यांनी गुणपडताळणी अर्ज विहित नमुन्यात सोमवारी (दि.१०) ते १९ जूनपर्यंत संबंधित शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे करावेत. त्या अर्जासोबत संकेतस्थळावरील गुणपत्रिकेची छायाप्रत जोडावी लागेल, तसेच उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देण्याची सुविधाही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविषयाच्या उत्तरपत्रिकेला ४०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल,अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.चित्रकलेचे ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना गुणमंडळातर्फे कलास्वाद, स्काऊट गाईड, एनसीसी, वाहतूक सुरक्षा, आरोग्य व शारीरिक शिक्षण, अशा विविध प्रकारांत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविणाºया विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना चित्रकला प्रकारात गुण देण्यात आले. एसीसीमध्ये १ आणि क्रीडामध्ये ४२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा