शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 8:13 PM

वाहनसंख्या पोहोंचली १३ लाखांवर 

ठळक मुद्देदुचाकींची संख्या तब्बल १० लाखअवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १३ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. महिन्याला सुमारे आठ हजार तर दररोज जवळपास २५१ नव्या वाहनांची भर पडत आहे. जुन्या आणि भंगार वाहनांनी प्रदूषणाला हातभार लागत असून, शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण अशी औरंगाबादची ओळख नाहीशी होत आहे. 

शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये दुचाकींची संख्या १० लाखांवर आहे. वाहनांमधून कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पीयूसी तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांतून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा ‘पीयूसी’चा उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात पीयूसी केवळ दंड वाचविण्यासाठीचे साधन झाले आहे. ते देणाऱ्या यंत्रणेकडून गांभीर्याने तपासणी होत  नाही. शिवाय जिल्ह्यात दुचाकींची संख्या अधिक आहे. दुचाकींनाही दरवर्षी पीयूसी तपासणी बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. 

महिन्याला ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवरजिल्ह्यात दर महिन्याला सुमारे ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वर्षाला एक लाख वाहनांची भर पडत आहे. २०१० मध्ये जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे. 

५४९ इलेक्ट्रिक दुचाकीजिल्ह्यात ५८५ इलेक्ट्रिक वाहने आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या ५४९ इतकी आहे. उर्वरित वाहने ही कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करणारी आहेत. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात त्यांची संख्या तोकडीच आहे. त्याशिवाय एकच सीएनजी वाहन आहे. 

फक्त ३६ सिटी बसशहरात आजघडीला केवळ ३६ स्मार्ट सिटी बस धावत आहे. शहराच्या तुलनेत त्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, दुचाकी वाहन वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यातूनच वाहनांची संख्या वाढत आहे आणि वायू प्रदूषणाला हातभार लागत आहे.

मानकांप्रमाणे हवे वायूंचे प्रमाणवाहनांसाठी दिलेल्या मानकांप्रमाणे वायूंचे प्रमाण पाहिजे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर त्या वाहनाला पीयूसी प्रमाणपत्र दिले जात नाही. बीएस-३ वाहनांना सहा महिन्याला हे प्रमाणपत्र घ्यावे लागते, तर बीएस-४ वाहनांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील परिस्थितीएकूण वाहनांची संख्या    १३ लाख ७९ हजार ४६२दुचाकी    १० लाख ८६ हजार ५२९रिक्षा    ३४ हजार ७२७मोटार कार    ८२ हजार ४७९जीप    २९ हजार ३२२ट्रक    १५ हजार ८८३टँकर    ४ हजार ७८१ट्रॅक्टर    २९ हजार ३७६रुग्णवाहिका    ५३८मिनी बस    २ हजार १७९स्कूल बस    १ हजार १२५

असे हवे वायूचे प्रमाण- पेट्रोल वाहनकार्बन मोनोक्साईडची कमाल मर्यादा ३.५ %.हायड्रोकार्बनची कमाल मर्यादा ४५०० पीपीएम (पर पार्ट मिलियन)- डिझेल वाहनकाळ्या धुराचे प्रमाण- २.४५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण