शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात रस्ते अपघातांत ५९३ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:44 IST

खराब रस्त्यांबरोबर वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष बेतते वाहनचालकाच्या जिवावर

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ४७९ प्राणांतिक अपघात झालेअपघातात ६२५ पेक्षा अधिक लोक जखमी

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४७९ रस्ते अपघातांत तब्बल ५९३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही केवळ प्राणांतिक अपघातांची संख्या आहे. किरकोळ जखमीपासून तर गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण यापेक्षा अधिक आहेत. वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला. मात्र, तरीही अपघात कमी होण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.

राज्यात सर्वत्र अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दररोज कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. हीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्याचीही आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याला ८ हजार आणि रोज सरासरी २५१ नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक  आहे. गेल्या काही वर्षात औरंगाबाद शहराचा चारही बाजूंनी झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. या सगळ्यात अरुंद व खड्डेमय रस्ते यासह वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळते आहे. 

जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात ४१६ जणांचा अपघातात बळी गेला होता. वर्षाअखेरीस अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५९३ वर गेली. नव्या वर्षातही अपघातांच्या घटना सुरूच आहेत. वाढत्या अपघातांमुळे नोव्हेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा समितीने तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पारित केले. त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस स्टेशनचे प्रभारी, मोटार वाहन निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश असलेल्या वाहन अपघात विश्लेषण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांची औरंगाबाद शहर व ग्रामीण पोलीस स्टेशननिहाय नियुक्ती केली. त्यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहे.  औरंगाबाद शहरात २१ ब्लॅक स्पॉट  असल्याचे ६ महिन्यांपूर्वी समोर आल. त्याठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या. तरीही अपघातात जीव जाणे सुरूच आहे.

शहरात ६० टक्के अपघात या भागांतशहरातील ६० टक्के अपघात वाळूज महानगर, छावणी, पडेगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा या भागांतील रस्त्यांवर होत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली. बीड बायपासवरील अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात आले.

६२५ पेक्षा अधिक लोक जखमीजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात ६२५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यात किरकोळ जखमी ते गंभीर रुग्णांचा समावेश आहे. देशात दर चार मिनिटाला रस्ते अपघातात एकाचा बळी जातो. अपघातांमध्ये ३० टक्के अपघात हे दुचाकींचे असतात. अपघातात १५ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्ती मृत्यू पावण्याचे प्रमाण ७२ टक्के आहे.

ही आहेत अपघातांची कारणेअरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, अशास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक, धोकादायक वळण यासह अतिवेगाने, मद्यपान करून, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणे, भंगार वाहन आणि वाहतूक नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना हातभार लागत आहे. 

उपायांसह जनजागृती, कारवाईअपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अपघात विश्लेषण समितीमार्फत काम केले जात आहे. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपघातस्थळी आवश्यक त्या उपाययोजना क रण्यावर भर दिला जातो. त्याबरोबर मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर कारवाई केली जाते. - स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

अपघातांची परिस्थिती : एकूण अपघात :  मृत्यूऔरंगाबाद शहर    : १८१    : १९९औरंगाबाद ग्रामीण    : २९८    : ३९४एकूण     :४७९ : ५९३

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद