शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात रस्ते अपघातांत ५९३ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:44 IST

खराब रस्त्यांबरोबर वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष बेतते वाहनचालकाच्या जिवावर

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ४७९ प्राणांतिक अपघात झालेअपघातात ६२५ पेक्षा अधिक लोक जखमी

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४७९ रस्ते अपघातांत तब्बल ५९३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही केवळ प्राणांतिक अपघातांची संख्या आहे. किरकोळ जखमीपासून तर गंभीर जखमी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण यापेक्षा अधिक आहेत. वाढत्या अपघातांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा लाल यादीत समावेश झाला. मात्र, तरीही अपघात कमी होण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.

राज्यात सर्वत्र अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दररोज कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. हीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्याचीही आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. महिन्याला ८ हजार आणि रोज सरासरी २५१ नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वाहनांच्या संख्येत दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक  आहे. गेल्या काही वर्षात औरंगाबाद शहराचा चारही बाजूंनी झपाट्याने विस्तार झाला. त्यामुळे महामार्ग ओलांडून शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली. शहर परिसरातील महामार्गांवर अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. या सगळ्यात अरुंद व खड्डेमय रस्ते यासह वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण मिळते आहे. 

जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात ४१६ जणांचा अपघातात बळी गेला होता. वर्षाअखेरीस अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५९३ वर गेली. नव्या वर्षातही अपघातांच्या घटना सुरूच आहेत. वाढत्या अपघातांमुळे नोव्हेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद जिल्हा लाल यादीत गेला. ही बाब गांभीर्याने घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा समितीने तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पारित केले. त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस स्टेशनचे प्रभारी, मोटार वाहन निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश असलेल्या वाहन अपघात विश्लेषण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांची औरंगाबाद शहर व ग्रामीण पोलीस स्टेशननिहाय नियुक्ती केली. त्यांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहे.  औरंगाबाद शहरात २१ ब्लॅक स्पॉट  असल्याचे ६ महिन्यांपूर्वी समोर आल. त्याठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या. तरीही अपघातात जीव जाणे सुरूच आहे.

शहरात ६० टक्के अपघात या भागांतशहरातील ६० टक्के अपघात वाळूज महानगर, छावणी, पडेगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा या भागांतील रस्त्यांवर होत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली. बीड बायपासवरील अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात आले.

६२५ पेक्षा अधिक लोक जखमीजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात ६२५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यात किरकोळ जखमी ते गंभीर रुग्णांचा समावेश आहे. देशात दर चार मिनिटाला रस्ते अपघातात एकाचा बळी जातो. अपघातांमध्ये ३० टक्के अपघात हे दुचाकींचे असतात. अपघातात १५ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्ती मृत्यू पावण्याचे प्रमाण ७२ टक्के आहे.

ही आहेत अपघातांची कारणेअरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, अशास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक, धोकादायक वळण यासह अतिवेगाने, मद्यपान करून, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणे, भंगार वाहन आणि वाहतूक नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपघातांना हातभार लागत आहे. 

उपायांसह जनजागृती, कारवाईअपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अपघात विश्लेषण समितीमार्फत काम केले जात आहे. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपघातस्थळी आवश्यक त्या उपाययोजना क रण्यावर भर दिला जातो. त्याबरोबर मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर कारवाई केली जाते. - स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

अपघातांची परिस्थिती : एकूण अपघात :  मृत्यूऔरंगाबाद शहर    : १८१    : १९९औरंगाबाद ग्रामीण    : २९८    : ३९४एकूण     :४७९ : ५९३

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद