शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

औरंगाबाद शहराची ‘वाट’ लावून व्याज खातेय मनपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:28 IST

केंद्र आणि राज्य शासनाने मागील पाच ते सात वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सढळ हाताने मदत केली. आतापर्यंत महापालिकेला वेगवेगळ्या योजनांसाठी तब्बल ६४९ कोटी रुपये प्राप्त झाले.

ठळक मुद्दे१४६ कोटी : केंद्र-राज्याकडून ६४९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने मागील पाच ते सात वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सढळ हाताने मदत केली. आतापर्यंत महापालिकेला वेगवेगळ्या योजनांसाठी तब्बल ६४९ कोटी रुपये प्राप्त झाले. हा शासन निधी विकास कामांसाठी वापरणे सोडून महापालिकेने १४६ कोटींचे व्याज कमविण्याची किमया केली. या निधीत आणखी १०० कोटींची भर पडणार आहे. त्यातील ३० कोटी रुपये ३१ मार्चच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले.

महापालिकेने मागील ३० वर्षांमध्ये स्वत: आर्थिकरीत्या सक्षम होण्यासाठी कधीच प्रयत्न केलेले नाहीत. दरवर्षी निधी नाही, अशी ओरड करण्यात येते. विकासकामांसाठी पैसा आहे कुठे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात येतो. मनपाकडे उपलब्ध निधीचे कधीच नियोजन होत नाही. उत्पन्न कमी आणि खर्च चारपट ही नेहमीची अवस्था. शहरातील पाणी प्रश्न, गटार योजना, स्मार्ट सिटी, घरकुल योजना, रस्ते आदी कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने सढळ हाताने मदत केली. शासनाकडून आलेला निधी वर्षानुवर्षे फिक्त डिपॉझिटमध्ये पडून आहे. त्यावरील व्याजाचा आकडा बघितला तर तो थक्क करणारा आहे.

१०० कोटीतून ३० कोटी रुपये प्राप्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील ५० रस्ते सिमेंट क्राँक्रीटने तयार व्हावेत म्हणून १०० कोटींचा निधी मंजूर केला. ३१ मार्चच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० कोटी रुपये प्राप्त झाले. हा निधी जिल्हाधिकारी आपल्या निगराणीखाली ठेवणार आहेत. हा निधी मनपाला वर्ग करण्याची शक्यता कमीच आहे. मागील १० महिन्यांपासून या रस्त्यावर मनपात जोरदार वादविवाद सुरू आहेत. आता तर प्रकरण थेट खंडपीठात पोहोचले आहे.

समांतर जलवाहिनीवर १०२ कोटी व्याजशहरातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने २००१ मध्ये महापालिकेला १६१ कोटी रुपये दिले. पाणीपुरवठा योजना सुरू करा, आणखी एवढीच रक्कम देण्याची हमी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतली. महापालिकेने योजना पीपीपी मॉडेलवर तयार करून संपूर्ण पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून टाकले. अवघ्या दीड वर्षात खाजगी कंपनीची हकालपट्टी करण्यात आली. समांतर जलवाहिनी योजना असून जायकवाडीतच खितपत पडली आहे. या योजनेच्या मूळ रकमेवर १०२ कोटी रुपये निव्वळ व्याज जमा झाले आहे.

भूमिगत गटार योजनामागील ३० वर्षांपासून महापालिका दूषित पाणी नाल्यांमध्ये सोडून देत आहे. त्यामुळे शहर आणि आसपासचे जलसाठे दूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने १६४ कोटी रुपये भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी दिले. २०१३ मध्ये हा निधी प्राप्त झाला. योजनेचे ८० टक्के काम झाले. त्यावर २२ कोटी रुपये व्याज महापालिकेने मिळविले. योजना पूर्ण करण्यासाठी मनपाला आणखी ८० कोटींची गरज आहे. त्यासाठी कर्ज उभारण्याची तयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.

स्मार्ट सिटीचे२८१ कोटी पडूनकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला आतापर्यंत २८१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मागील एक वर्षापासून हा निधी बँकेत फिक्स डिपॉझिट करून ठेवला आहे. त्यावर व्याजच १३ कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या उद्देशासाठी निधी दिला आहे, ती कामे अजून सहा महिने तरी सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. व्याज किती वाढते हे बघण्याचे काम महापालिका करीत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारMONEYपैसाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद