शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

औरंगाबाद शहराची ‘वाट’ लावून व्याज खातेय मनपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:28 IST

केंद्र आणि राज्य शासनाने मागील पाच ते सात वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सढळ हाताने मदत केली. आतापर्यंत महापालिकेला वेगवेगळ्या योजनांसाठी तब्बल ६४९ कोटी रुपये प्राप्त झाले.

ठळक मुद्दे१४६ कोटी : केंद्र-राज्याकडून ६४९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने मागील पाच ते सात वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सढळ हाताने मदत केली. आतापर्यंत महापालिकेला वेगवेगळ्या योजनांसाठी तब्बल ६४९ कोटी रुपये प्राप्त झाले. हा शासन निधी विकास कामांसाठी वापरणे सोडून महापालिकेने १४६ कोटींचे व्याज कमविण्याची किमया केली. या निधीत आणखी १०० कोटींची भर पडणार आहे. त्यातील ३० कोटी रुपये ३१ मार्चच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले.

महापालिकेने मागील ३० वर्षांमध्ये स्वत: आर्थिकरीत्या सक्षम होण्यासाठी कधीच प्रयत्न केलेले नाहीत. दरवर्षी निधी नाही, अशी ओरड करण्यात येते. विकासकामांसाठी पैसा आहे कुठे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात येतो. मनपाकडे उपलब्ध निधीचे कधीच नियोजन होत नाही. उत्पन्न कमी आणि खर्च चारपट ही नेहमीची अवस्था. शहरातील पाणी प्रश्न, गटार योजना, स्मार्ट सिटी, घरकुल योजना, रस्ते आदी कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने सढळ हाताने मदत केली. शासनाकडून आलेला निधी वर्षानुवर्षे फिक्त डिपॉझिटमध्ये पडून आहे. त्यावरील व्याजाचा आकडा बघितला तर तो थक्क करणारा आहे.

१०० कोटीतून ३० कोटी रुपये प्राप्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील ५० रस्ते सिमेंट क्राँक्रीटने तयार व्हावेत म्हणून १०० कोटींचा निधी मंजूर केला. ३१ मार्चच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० कोटी रुपये प्राप्त झाले. हा निधी जिल्हाधिकारी आपल्या निगराणीखाली ठेवणार आहेत. हा निधी मनपाला वर्ग करण्याची शक्यता कमीच आहे. मागील १० महिन्यांपासून या रस्त्यावर मनपात जोरदार वादविवाद सुरू आहेत. आता तर प्रकरण थेट खंडपीठात पोहोचले आहे.

समांतर जलवाहिनीवर १०२ कोटी व्याजशहरातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने २००१ मध्ये महापालिकेला १६१ कोटी रुपये दिले. पाणीपुरवठा योजना सुरू करा, आणखी एवढीच रक्कम देण्याची हमी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतली. महापालिकेने योजना पीपीपी मॉडेलवर तयार करून संपूर्ण पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून टाकले. अवघ्या दीड वर्षात खाजगी कंपनीची हकालपट्टी करण्यात आली. समांतर जलवाहिनी योजना असून जायकवाडीतच खितपत पडली आहे. या योजनेच्या मूळ रकमेवर १०२ कोटी रुपये निव्वळ व्याज जमा झाले आहे.

भूमिगत गटार योजनामागील ३० वर्षांपासून महापालिका दूषित पाणी नाल्यांमध्ये सोडून देत आहे. त्यामुळे शहर आणि आसपासचे जलसाठे दूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने १६४ कोटी रुपये भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी दिले. २०१३ मध्ये हा निधी प्राप्त झाला. योजनेचे ८० टक्के काम झाले. त्यावर २२ कोटी रुपये व्याज महापालिकेने मिळविले. योजना पूर्ण करण्यासाठी मनपाला आणखी ८० कोटींची गरज आहे. त्यासाठी कर्ज उभारण्याची तयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.

स्मार्ट सिटीचे२८१ कोटी पडूनकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला आतापर्यंत २८१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मागील एक वर्षापासून हा निधी बँकेत फिक्स डिपॉझिट करून ठेवला आहे. त्यावर व्याजच १३ कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या उद्देशासाठी निधी दिला आहे, ती कामे अजून सहा महिने तरी सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. व्याज किती वाढते हे बघण्याचे काम महापालिका करीत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारMONEYपैसाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद