शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

औरंगाबाद : ‘समांतर’च्या बैठकीवर भाजपने फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:34 IST

समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलनाचे वादंग : तातडीने अपुऱ्या पाणीपुरवठ्यासाठी बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेतील ‘समांतर’ची बैठक सोडून महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच पदाधिकारी व अधिकाºयांना एन- ५ कडे धाव घ्यावी लागली.

पाणीटंचाईचा मुद्दा पुढे करत भाजप, काँग्रेस आणि इतर नगरसेवकांनी सिडको-हडको आणि जालना रोडच्या पलीकडील अनेक वॉर्डांना पाणीच येत नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बापू घडामोडे, माधुरी अदवंत , काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, सोहेल शेख आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महपौर घोडेले आणि नवल किशोर राम यांनी तातडीने महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजित करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर महापालिकेत नगरसेवकांसमवेत पदाधिकारी व अधिकारी अशी बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही पाणीप्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपने ‘समांतर’च्या बैठकीवर आंदोलनाच्या माध्यमाने पाणी फेरल्याची चर्चा महापालिकेत होती.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्याचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटीला परत देता येऊ शकते का, याची चाचपणी राज्य शासन, मनपाकडून सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी एक बैठकही घेण्यात आली. या बैठकीस भाजप, सेना, एमआयएम आमदार उपस्थित होते. यानंतर कंपनीच्या अधिकाºयांनी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही भेट घेतली. त्यांनी सोमवार ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मनपात कंपनीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘समांतर जलवाहिनीवरून जोरदार राजकारण सुरू असून त्याचा प्रत्यय सोमवारीही आला.

चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीस्थायी समितीच्या सभागृहात आंदोलक नगरसेवकांसमवेत दुपारी १ वाजता बैठकीला सुरुवात झाली. यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे दु:ख मांडत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. महापौर घोडेले यांनी त्यांना विचारणा केली की, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत. यावर चहल यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. शेवटी प्रभारी आयुक्तांनी नमूद केले की, आज सायंकाळी ६ वाजता मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

‘सर्व वॉर्डांत तीन दिवसांआड पाणी द्या’शहरातील अनेक वॉर्डांना पाच आणि सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सोमवारी सकाळी झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या, मंगळवारपासूनच याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशही त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी त्वरित अंमलबजावणीस होकारही दर्शविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सर्व पाणीपुरवठ्याचे अधिकारी एकत्र बसून नियोजन करणार आहेत. शहरातील ५० वॉर्डांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उर्वरित वॉर्डांना तीन, चार आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नियोजन करून उन्हाळ्यात तीन दिवसांआड पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम