शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

औरंगाबाद : ‘समांतर’च्या बैठकीवर भाजपने फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:34 IST

समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलनाचे वादंग : तातडीने अपुऱ्या पाणीपुरवठ्यासाठी बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेतील ‘समांतर’ची बैठक सोडून महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच पदाधिकारी व अधिकाºयांना एन- ५ कडे धाव घ्यावी लागली.

पाणीटंचाईचा मुद्दा पुढे करत भाजप, काँग्रेस आणि इतर नगरसेवकांनी सिडको-हडको आणि जालना रोडच्या पलीकडील अनेक वॉर्डांना पाणीच येत नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बापू घडामोडे, माधुरी अदवंत , काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, सोहेल शेख आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महपौर घोडेले आणि नवल किशोर राम यांनी तातडीने महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजित करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर महापालिकेत नगरसेवकांसमवेत पदाधिकारी व अधिकारी अशी बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही पाणीप्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपने ‘समांतर’च्या बैठकीवर आंदोलनाच्या माध्यमाने पाणी फेरल्याची चर्चा महापालिकेत होती.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्याचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटीला परत देता येऊ शकते का, याची चाचपणी राज्य शासन, मनपाकडून सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी एक बैठकही घेण्यात आली. या बैठकीस भाजप, सेना, एमआयएम आमदार उपस्थित होते. यानंतर कंपनीच्या अधिकाºयांनी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही भेट घेतली. त्यांनी सोमवार ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मनपात कंपनीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘समांतर जलवाहिनीवरून जोरदार राजकारण सुरू असून त्याचा प्रत्यय सोमवारीही आला.

चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीस्थायी समितीच्या सभागृहात आंदोलक नगरसेवकांसमवेत दुपारी १ वाजता बैठकीला सुरुवात झाली. यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे दु:ख मांडत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. महापौर घोडेले यांनी त्यांना विचारणा केली की, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत. यावर चहल यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. शेवटी प्रभारी आयुक्तांनी नमूद केले की, आज सायंकाळी ६ वाजता मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

‘सर्व वॉर्डांत तीन दिवसांआड पाणी द्या’शहरातील अनेक वॉर्डांना पाच आणि सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सोमवारी सकाळी झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या, मंगळवारपासूनच याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशही त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी त्वरित अंमलबजावणीस होकारही दर्शविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सर्व पाणीपुरवठ्याचे अधिकारी एकत्र बसून नियोजन करणार आहेत. शहरातील ५० वॉर्डांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उर्वरित वॉर्डांना तीन, चार आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नियोजन करून उन्हाळ्यात तीन दिवसांआड पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम